शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धडा न घेतल्यानेच २००८ मधील महापुराची पुनरावृत्ती!

By संजय पाठक | Updated: August 12, 2019 02:04 IST

२००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापूर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. पुरातून सावरत नाही तर पूररेषा नावाचे महासंकट उभे राहिले.

ठळक मुद्देनदीपात्रांचा संकोच कायम पुराची तीव्रता कमी करण्याचे उपाय कागदावरच

नाशिक : २००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापूर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. पुरातून सावरत नाही तर पूररेषा नावाचे महासंकट उभे राहिले. कोट्यवधी रुपयांच्या मिळकती त्यात अडकल्या. मग पूर आणि पूररेषा या दोन्ही संकटांतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याचे ठरले. त्यातून पूर प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे अहवाल तयार झाले. परंतु दहा वर्षांत त्यातील कोणतीही गोष्ट पुढे गेली नाही. परिणामी यंदा २००८ च्या पुराची आठवण होणे हे स्वाभाविकच होते.नाशिककरांच्या दृष्टीने तसा गोदाकाठी येणारा पूर नवा नाही. मात्र, २००८ मध्ये आलेला महापूर हा १९६९ मधील पुराची आठवण करून देणारा होता. १९६९चा महापूर निसर्गनिर्मित्त होता. तर २००८ मध्ये आलेला पुराला मानवनिर्मित होता. कोणत्याही नियोजनाशिवाय अचानक पाण्याचा विसर्ग केल्याने हा पूर आला होता. गोदाकाठी येणारा पूर नवा नसला तरी गंगापूररोडवरील सावरकरनगरपासून होळकर पुलापर्यंतचा सर्वच भाग बाधीत झाला. नासर्डी, वाघाडी आणि नंदिनी या नद्यांनादेखील महापूर आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजी महापालिकेची महासभा सुरू असतानाच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला असून, गंगापूररोडचा भाग पाण्यात गेला आहे असे निरोप येताच धावपळ झाली. त्यानंतर पुराने वेढलेल्या नागरिकांचे बचाव कार्य झाले आणि पूर ओसरला.पूर ओसरला परंतु नव्या समस्यांचा महापूर आला. गोदापात्रातील अतिक्रमणे त्याकडे होणारे दुर्लक्ष हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला, परंतु त्याचबरोबर महापालिकेचा विकास आराखडा १९८९ मध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर तो १९९३ ते ९५ असा टप्प्याटप्प्याने मंजूर झाला. या दरम्यान गोदाकाठी एक सुरक्षिततेची रेषा होती तीच नाहीशी करण्याचे कुटील कारस्थान यशस्वी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता २००८ ची पुनरावृत्ती नको म्हणून काळजी वाहू लागली आणि त्यातून जलसंपदा विभागाच्या वतीने पूररेषा आखण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. परंतु ही पूररेषा म्हणजे भलतीच आपत्ती ठरल्याचा अनेकांचा रोष आहे.दहा वर्षांपासून कारवाई शून्यपूररेषेची नव्हे खरे तर पुराची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राने उपाययोजना सुचवल्या. परंतु दहा वर्षे यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २००८ सालच्या पुराची पुनरावृत्ती नाशिककरांनी अनुभवली.४पूररेषेतील सर्व अडथळे जैसे थे आहेत. मग पूर येणार नाही तर काय होणार? यंदा नियोजनपूर्वक गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला हा एक भाग पथ्यावर पडला आणि पुरामुळे जीवितहानी झाली नाही. तथापि, मिळकतींचे नुकसान टाळता आले नाही हे विसरून कसे चालेल ?

टॅग्स :NashikनाशिकNashik Floodनाशिक पूर