शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धडा न घेतल्यानेच २००८ मधील महापुराची पुनरावृत्ती!

By संजय पाठक | Updated: August 12, 2019 02:04 IST

२००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापूर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. पुरातून सावरत नाही तर पूररेषा नावाचे महासंकट उभे राहिले.

ठळक मुद्देनदीपात्रांचा संकोच कायम पुराची तीव्रता कमी करण्याचे उपाय कागदावरच

नाशिक : २००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापूर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. पुरातून सावरत नाही तर पूररेषा नावाचे महासंकट उभे राहिले. कोट्यवधी रुपयांच्या मिळकती त्यात अडकल्या. मग पूर आणि पूररेषा या दोन्ही संकटांतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याचे ठरले. त्यातून पूर प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे अहवाल तयार झाले. परंतु दहा वर्षांत त्यातील कोणतीही गोष्ट पुढे गेली नाही. परिणामी यंदा २००८ च्या पुराची आठवण होणे हे स्वाभाविकच होते.नाशिककरांच्या दृष्टीने तसा गोदाकाठी येणारा पूर नवा नाही. मात्र, २००८ मध्ये आलेला महापूर हा १९६९ मधील पुराची आठवण करून देणारा होता. १९६९चा महापूर निसर्गनिर्मित्त होता. तर २००८ मध्ये आलेला पुराला मानवनिर्मित होता. कोणत्याही नियोजनाशिवाय अचानक पाण्याचा विसर्ग केल्याने हा पूर आला होता. गोदाकाठी येणारा पूर नवा नसला तरी गंगापूररोडवरील सावरकरनगरपासून होळकर पुलापर्यंतचा सर्वच भाग बाधीत झाला. नासर्डी, वाघाडी आणि नंदिनी या नद्यांनादेखील महापूर आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजी महापालिकेची महासभा सुरू असतानाच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला असून, गंगापूररोडचा भाग पाण्यात गेला आहे असे निरोप येताच धावपळ झाली. त्यानंतर पुराने वेढलेल्या नागरिकांचे बचाव कार्य झाले आणि पूर ओसरला.पूर ओसरला परंतु नव्या समस्यांचा महापूर आला. गोदापात्रातील अतिक्रमणे त्याकडे होणारे दुर्लक्ष हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला, परंतु त्याचबरोबर महापालिकेचा विकास आराखडा १९८९ मध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर तो १९९३ ते ९५ असा टप्प्याटप्प्याने मंजूर झाला. या दरम्यान गोदाकाठी एक सुरक्षिततेची रेषा होती तीच नाहीशी करण्याचे कुटील कारस्थान यशस्वी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता २००८ ची पुनरावृत्ती नको म्हणून काळजी वाहू लागली आणि त्यातून जलसंपदा विभागाच्या वतीने पूररेषा आखण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. परंतु ही पूररेषा म्हणजे भलतीच आपत्ती ठरल्याचा अनेकांचा रोष आहे.दहा वर्षांपासून कारवाई शून्यपूररेषेची नव्हे खरे तर पुराची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राने उपाययोजना सुचवल्या. परंतु दहा वर्षे यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २००८ सालच्या पुराची पुनरावृत्ती नाशिककरांनी अनुभवली.४पूररेषेतील सर्व अडथळे जैसे थे आहेत. मग पूर येणार नाही तर काय होणार? यंदा नियोजनपूर्वक गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला हा एक भाग पथ्यावर पडला आणि पुरामुळे जीवितहानी झाली नाही. तथापि, मिळकतींचे नुकसान टाळता आले नाही हे विसरून कसे चालेल ?

टॅग्स :NashikनाशिकNashik Floodनाशिक पूर