शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:34 IST

सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपंडित पोहनकर : अभिजात संगीताचा वारसा जोपासण्याची गरज

नाशिक : सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.गेली सहा दशके गायन क्षेत्रात योगदान देणाऱ्या पंडितजींनी मंगळवारी (दि.१०) शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले त्यानंतर नाशिकमध्ये मुक्काम केला. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी अनेक विषयांवर मुक्त संवाद साधला. वयाच्या नवव्या वर्षी मोठ्या गायकांसमोर गाणाºया पंडितजींचे त्यावेळी केवळ कौतुकच झाले नाही तर इतक्या लहान वयात त्यांनी आदर प्राप्त केला. त्यांची संगीत सेवा अव्याहत सुरूच आहे.देशाला शास्त्रीय गायकीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे या गायकीच्या वारसा दीर्घकाळ टिकणारच असे खात्रीलायक सांगणाºया पंडितजींनी नवीन पिढीत काही चांगले गायक, संगीतकार आहेत, त्यांना काही ना काही करावेसे वाटते ही चांगली बाब आहे. राहुल देशपांडे, राकेश चौरसिया अशी अनेकांची नावे घेता येतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. नवीन पिढीची वाटचाल चांगली सुरू आहे, असे सांगताना त्यांनी चॅनल्सवरील रिअ‍ॅलिटी शोच्या नावाखाली चालणाºया अनेक गायनाचे कार्यक्रम वास्तविक वाटत नाही. अनेकदा जज देखील संयुक्तिक नसतात. कलावंतांना त्यांच्या गायकीपेक्षा मोेठे करताना असे स्पर्धक गायक लोकप्रिय होतात; मात्र लोकप्रियतेचे निकष वेगळे असतात. लोकप्रिय होणे म्हणजे गायनाचा दर्जा असतोच असे नाही त्यामुळे लोकप्रियतेपेक्षा गायनाच्या दर्जावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.संगीत शिक्षण देणाºया संस्था वाढल्या आहेत. परफॉर्मिंग आर्ट्सची कॉलेजेस वाढत आहेत; परंतु त्यातून किती जण पुढे येतात किंवा तग धरू शकतात हा महत्त्वाचा भाग आहे. नव्या पिढीत खूप टॅलेंट आहे; परंतु तो पीआर किंवा लोकप्रियतेशी जोडला जातो, ते टाळले पाहिजे असेही पंडितजी म्हणाले.तर ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा...४रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायकांना गाणे म्हटल्यानंतर एसएमएससाठी प्रेक्षकांना आवाहन करावे लागते. येणाºया एसएमएसवर निकाल ठरविला जातो, हा प्रकार खटकणारा असल्याचे सांगतानाच पंडित पोहनकर यांनी एसएमएससाठी स्पर्धकांनी आवाहन करण्यापेक्षा ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक