शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:34 IST

सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपंडित पोहनकर : अभिजात संगीताचा वारसा जोपासण्याची गरज

नाशिक : सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.गेली सहा दशके गायन क्षेत्रात योगदान देणाऱ्या पंडितजींनी मंगळवारी (दि.१०) शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले त्यानंतर नाशिकमध्ये मुक्काम केला. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी अनेक विषयांवर मुक्त संवाद साधला. वयाच्या नवव्या वर्षी मोठ्या गायकांसमोर गाणाºया पंडितजींचे त्यावेळी केवळ कौतुकच झाले नाही तर इतक्या लहान वयात त्यांनी आदर प्राप्त केला. त्यांची संगीत सेवा अव्याहत सुरूच आहे.देशाला शास्त्रीय गायकीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे या गायकीच्या वारसा दीर्घकाळ टिकणारच असे खात्रीलायक सांगणाºया पंडितजींनी नवीन पिढीत काही चांगले गायक, संगीतकार आहेत, त्यांना काही ना काही करावेसे वाटते ही चांगली बाब आहे. राहुल देशपांडे, राकेश चौरसिया अशी अनेकांची नावे घेता येतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. नवीन पिढीची वाटचाल चांगली सुरू आहे, असे सांगताना त्यांनी चॅनल्सवरील रिअ‍ॅलिटी शोच्या नावाखाली चालणाºया अनेक गायनाचे कार्यक्रम वास्तविक वाटत नाही. अनेकदा जज देखील संयुक्तिक नसतात. कलावंतांना त्यांच्या गायकीपेक्षा मोेठे करताना असे स्पर्धक गायक लोकप्रिय होतात; मात्र लोकप्रियतेचे निकष वेगळे असतात. लोकप्रिय होणे म्हणजे गायनाचा दर्जा असतोच असे नाही त्यामुळे लोकप्रियतेपेक्षा गायनाच्या दर्जावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.संगीत शिक्षण देणाºया संस्था वाढल्या आहेत. परफॉर्मिंग आर्ट्सची कॉलेजेस वाढत आहेत; परंतु त्यातून किती जण पुढे येतात किंवा तग धरू शकतात हा महत्त्वाचा भाग आहे. नव्या पिढीत खूप टॅलेंट आहे; परंतु तो पीआर किंवा लोकप्रियतेशी जोडला जातो, ते टाळले पाहिजे असेही पंडितजी म्हणाले.तर ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा...४रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायकांना गाणे म्हटल्यानंतर एसएमएससाठी प्रेक्षकांना आवाहन करावे लागते. येणाºया एसएमएसवर निकाल ठरविला जातो, हा प्रकार खटकणारा असल्याचे सांगतानाच पंडित पोहनकर यांनी एसएमएससाठी स्पर्धकांनी आवाहन करण्यापेक्षा ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक