शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रही आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:52 IST

महाराष्ट्रात सध्या विचित्र स्थिती आहे. मुख्यमंत्री कुठेही जात नाहीत आणि मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राज्यात अनेक मंत्री घेाटाळ्यात अडकले आहेत. अनेकांची मंत्रालयातील खुर्ची हालते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जायलाही घाबरतो, अशी सडकून टीकाही त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देनारायण राणे यांची सडकून टीका जेलमध्ये जाण्यासाठी अनेक मंत्री वेटिंग लिस्टवर

नाशिक : महाराष्ट्रात सध्या विचित्र स्थिती आहे. मुख्यमंत्री कुठेही जात नाहीत आणि मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राज्यात अनेक मंत्री घेाटाळ्यात अडकले आहेत. अनेकांची मंत्रालयातील खुर्ची हालते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जायलाही घाबरतो, अशी सडकून टीकाही त्यांनी केली आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने आडगाव शिवारात साकारण्यात येणाऱ्या आयटी हबच्या प्रोत्साहनासाठी नाशिक आयटी इन्क्लेव्ह २०२२ चे आयोजन मंगळवारी (दि.१) येथील हॉटेल ताजमध्ये करण्यात आले हेाते. त्यावेळी ते बोलत होते. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते, तर माजी मंत्री जयकुमार रावल, ज्येष्ठ नेते प्रकाश पाठक, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले तसेच सीमा हिरे यांच्यासह महापालिकेचे अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यातील प्रमुख अडीचशे आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेेला उपस्थित होते. उद्योजकांना काय हवे आहे, ते त्यांनी सांगण्याच्या आत देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे सांगताना महाराष्ट्र मात्र गेल्या काही वर्षांपासून उद्योग क्षेत्रात मागे पडला आहे. त्याचे कारण राज्यात आलेल्या सरकारकडून विकास, शिक्षण, प्रगती यासारख्या मुद्यांवर चर्चाच होत नाही असे सांगून राणे म्हणाले की, राज्यात सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपशी गद्दारी करून तसेच मराठी आणि हिंदुत्ववादाला मूठमाती देऊन मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मेहेरबानीवर टिकून आहे. महाराष्ट्राचे शाेषण सुरू असून अनेक नेते जेलमध्ये जाण्याच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत, असेही ते म्हणाले. राज्यातील अनेक मंत्र्यांच्या खुर्च्या हालत आहेत. मंगळवारी (दि.१) युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी मुंबईत विमानाने दाखल झाले. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी देखील मुख्यमंत्री आले नाहीत. मंत्रालयातही ते जात नाहीत, महाराष्ट्रच आजारी पडला आहे, असे ते म्हणाले.

इन्फो..

भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कला मंजुरी

भिंवडीमध्ये पाचशे एकरमध्ये आयटी पार्क साकारण्याचा प्रस्ताव आहे, त्याच धर्तीवर नाशिकमध्येही आयटी पार्कचा प्रस्ताव पाठवल्यास तो मंजूर केला जाईल, असे राणे यांनी सांगितले.

इन्फो..

खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती ईडीला देण्यात येईल, असे सांगितले. त्यावर सेनेच्या नेत्यांच्या आणि भ्रष्टाचाराची चोपडी आपल्याकडे असून ती देखील ईडीला देण्यात येणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. राऊत यांच्यापेक्षा शिवसेनेच्या नेत्यांची मला जास्त माहिती आहे, असे ते म्हणाले.

इन्फेा...

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रथमच त्यावर भाष्य करताना राणे यांनी दिशा सालियनवर अत्याचार झालेत. तिच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला साथ दिली पाहिजे, असे सांगून राणे यांनी दिशाचे तिच्या कुटुंबीयांशी पटत नसल्याने मुळातच ती त्यांच्यासमवेत राहत नसल्याचे राणे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकNarayan Raneनारायण राणे