शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

केवळ उद्योजकांना नको, कामगारांना द्या पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:48 IST

आर्थिक मंदीबाबत सरकार उद्योगांना पॅकेज देऊन धोरणात काही बदल करीत आहे. त्यात कामगारांचाही विचार झाला पाहिजे, मंदीमुळे बाधीत कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा वेतन मिळावे यासह अन्य ठराव करून या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : आर्थिक मंदीबाबत सरकार उद्योगांना पॅकेज देऊन धोरणात काही बदल करीत आहे. त्यात कामगारांचाही विचार झाला पाहिजे, मंदीमुळे बाधीत कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा वेतन मिळावे यासह अन्य ठराव करून या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.औद्योगिक क्षेत्रात आर्थिक मंदीमुळे कामगारांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक उद्योगांमध्ये काम बंद, लेआॅफ कामगार कपात, विशेषत कंत्राटी कामगार व शिकाऊ कामगार यांना हजारोंच्या संख्येने कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही. लघुउद्योगही मोठ्या अडचणीत आहेत. यावर विचार मंथन करण्यासाठी खुटवडनगर येथील सिटू कामगार भवन येथे राज्यातील खासगी उद्योगातील विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आपल्या जिल्ह्यामध्ये मंदीमुळे उद्योगावर आणि कामगारांवर नेमका काय परिणाम झाला आहे याची माहिती कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सादर केली. केंद्र सरकारने कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार हक्कांवर केलेल्या हल्ल्यामुळे बेरोजगारी कशा पद्धतीने वाढली यावर सखोल चर्चा करण्यात आली.या चर्चेत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह आॅटोमोबाइल आणि सहायक क्षेत्रातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी व आर्थिक मंदीमुळे बाधीत अन्य क्षेत्रातील कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. राज्यातील कामगारांच्या वतीने काही ठराव करण्यात आलेत. हे ठराव अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात १६ ते २० सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी आणि कामगार विभागांच्या कार्यालयासमोर राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीस सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, किशोर ढोकळे, प्रवीण मोहिते, कॉ. उद्धव भावलकर, कॉ. राजू देसले, बाळासाहेब वाघ, कॉ. वसंत पवार, उत्तम खांडबहाले, कॉ. सईद अहमद, कॉ. विवेक मोंटेरो, बॉश युनियनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, अशोक घुगे, रूपेश वरपे, प्रवीण मोहिते, तुकाराम साळवी, संजय कसुर्डे, शशिकांत मांद्रे, दामोदर मानकापे, सीताराम ठोंबरे, भिवाजी भावले, कैलास धात्रक, श्रावण केदारे, योगेश अहिरे, विवेक कासार आदींनी आपले विचार मांडले.बैठकीतील प्रमुख ठरावकामगार कायद्यांमधील कामगार विरोधी प्रस्तावित बदल रद्द करावेत.मंदीच्या संकटावर सरकारने पर्यायी धोरणे अवलंबली पाहिजेत, ज्यामुळे देशी उद्योगांना मदत होईल आणि अधिकाधिक रोजगार निर्माण होतील.मुख्यत्वे किमान वेतन दरमहा १८ हजारांपर्यंत वाढवून, शेतकºयांच्या शेतीमालाला योग्य दर निश्चित करणे व अंमलबजावणी करून ६५०० रुपये दरमहा किमान पेन्शनची हमी देऊन जनतेची खरेदी शक्ती वाढविण्याच्या उपाययोजना करून मागणीचे संकट दूर केले पाहिजे.मंदीमुळे कामगार बेरोजगार झाले आहेत, यामध्ये कंत्राटी कामगार, एनईईएम आणि फिक्स टर्म कर्मचाºयांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून त्यांना पुन्हा नोकरीत काम मिळेपर्यंत किमान वेतनाच्या दरानुसार वेतन दिले पाहिजे.मंदीचे परिणाम आणि प्रतिसाद म्हणून घ्यावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीसमवेत आपत्कालीन बैठक बोलवा.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार