शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

‘अच्छे दिन’ नव्हे, दिवाळं काढलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:11 IST

चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’ दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

नाशिक : चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’  दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.  एसटी चालक-वाहक दररोज रस्त्यावर जीवन-मरणाचा खेळ खेळत एसटीला उत्पन्न मिळवून देत असले तरी या सरकारला त्यांच्या आर्थिक सुबत्तेविषयी कुठलेही सोयरसुतक नसल्याचे मत कर्मचाºयांनी व्यक्त केले. किमान वेतन कायद्यानुसार चालक-वाहकांना वेतनही दिले जात नाही. यामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न एसटी चालविणाºयांपुढे निर्माण झाला आहे. मात्र परिवहन प्रशासन व सरकार याबाबत अनभिज्ञ असल्याचे भासवत ‘कानावर हात’ ठेवून आहेत, यामुळे चालक-वाहकांवर राज्यव्यापी संप पुकारण्याची वेळ आली व या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया चालक-वाहकांनी बोलून दाखविली.आठ ते नऊ हजार रुपये दरमहा पगारात महामंडळाच्या अधिकाºयांनी कुटुंब चालवून दाखवावे. तुटपुंज्या वेतनामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले. संपामुळे दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले हे मान्य आहे; मात्र अच्छे दिन दाखविणाºयांना त्याची जाणीव नाही आणि आमच्या वेदनांची व सातत्याने होणारे हालही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे करणार काय? संप होऊ न देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे होते. - पांडुरंग बडदे, चालक३१ वर्षे महामंडळात वाहक म्हणून सेवा करीत आहे; मात्र कुटुंबासाठी काही कमविता आले नाही. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आजही तितकाच गंभीर वाटतो. लोकांचे झालेले हाल मान्य आहे; मात्र त्यांच्या त्रासापेक्षा आमचे हाल कितीतरी पटीने अधिक आहेत. संप योग्य आहे. - जालिंदर दहिफळे, वाहकसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संपाची वेळ आली. सरकारने चालक-वाहकांसह राज्यातील जनतेला वेठीस धरले. सरकारची भूमिका या संपाला कारणीभूत ठरली. भाडेवाढ केली मात्र त्या भाडेवाढीनंतर चालक-वाहकांना काय मिळाले? सरकारने चालक-वाहकांचा विचार करावा.  - पांडुरंग पवार, चालक