जिल्ात १६३ घरांची पडझडमंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ात वीज पडून तीन ठार तर सहा जण जखमी झाले. त्याचबरोबर १६३ घरांचे नुकसान होऊन शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राचे पत्रे उडाले. वीज पडून जखमी झालेल्यांमध्ये पेठ तालुक्यातील खोकरतळे येथील रामा पढरे, यशदा कानडी, कुमार मिसाळ, कार्तिक तांबडी या चौघांचा तर त्र्यंबकेश्वर येथील अंजना नमन शिंदे व धनराज राजपूत या दोघांचा समावेश आहे. मंगळवारी जिल्ातील नाशिक (११), इगतपुरी (१४), पेठ (१३), सुरगाणा (१५) मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. वादळीवार्याने झालेल्या पडझडीत नाशिक तालुक्यात- ६, इगतपुरी-४६, दिंडोरी-२, पेठ-८५, कळवण-१६, बागलाण-६, सिन्नरला दोन घरांचे नुकसान झाले असून, सुरगाणा येथे दुसर्या दिवशीही पंचनाम्याचे काम सुरू होते.
गैर तो गैर...=जोड
By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST