शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

प्रतिसाद नाही : येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा ‘स्मार्ट रोड’साठी फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:35 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देप्रतिसाद मिळत नसल्याने कंपनी परेशानवायफायसारख्या सुविधाही उपलब्ध

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला. त्यामुळे कंपनीने फेरनिविदा काढली असून येत्या ८ फेबु्रवारीला निविदा उघडण्यात येणार आहेत. डिसेंबर २०१७ पासूनच स्मार्ट रोडच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन होते. परंतु, एजन्सीचा प्रतिसादच मिळत नसल्याने कंपनी परेशान झालेली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यानच्या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रूपांतर केले जाणार असून, त्यात आकर्षक पथदीपांसह सायकल ट्रॅक व वायफायसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आॅक्टोबर २०१७ पासून स्मार्ट रोडसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी महिनाभरात स्मार्ट रोडचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचा दावा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केला होता. मात्र, निविदा प्रक्रियेत एकच एजन्सीने प्रतिसाद नोंदवला. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन एजन्सीचा सहभाग अपेक्षित असतो. परंतु, एकच एजन्सी पुढे आल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कंपनीने स्मार्ट रोडचा आराखडा तयार केलेला असून त्याचे सादरीकरण केपीएमजी या प्रकल्प सल्लागार संस्थेने यापूर्वीच केलेले आहे.कंपनीवर वाढता दबावपुढील वर्षी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटीची संकल्पना काही अंशी तरी जनतेसमोर प्रकट व्हावी, त्यातून काही प्रकल्प पूर्णत्वाला जावेत, याकरीता कंपनीच्या अधिकाºयांवर मोठा दबाव वाढला आहे. सन २०१८ मध्ये जास्तीत जास्त प्रकल्प लोकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, कंपनीचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट रोडलाच अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही. त्यामुळे कंपनीच्या अधिकाºयांमध्ये अस्वस्थता आहे.