नाशिक : पाणी वितरणाच्या योग्य व काटेकोर नियोजनावर भर देत नाशिककरांवर आणखी पाणीकपात लादायची नाही, या भूमिकेवर पालकमंत्री गिरीश महाजन ठाम असून, महापालिकेला वाढीव पाणी आरक्षणाबाबतचा फैसला येत्या मंगळवारी (दि.९) मुंबईत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनीही पत्रकारांशी बोलताना पाणीकपातीस विरोध दर्शवत पाणी वितरणातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महापौर अशोक मुर्तडक यांनी एकवेळ पाणीकपातीसोबतच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश प्रशासनाला वारंवार देऊनही निर्णय घेतला जात नसल्याने पाणीप्रश्न राजकीय स्तरावर पेटला आहे. आणखी पाणीकपात करायची किंवा नाही, याबाबत अंतिम निर्णय होण्यासाठी बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक निश्चित करण्यात आली होती. परंतु पालकमंत्री महाजन यांचे बुधवारी रात्री उशिराने नाशिकला आगमन झाले. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची महापूजा आटोपली.
आणखी पाणीकपात नाहीच!
By admin | Updated: February 4, 2016 23:02 IST