शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

येणाºया काळात नोकºया मिळणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:00 IST

नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणाºया काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोकºया उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोकºया मिळविण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले आहे.

ठळक मुद्देमाधव भांडारी : बीबीएनजीच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे वितरणउद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन

नाशिक : जगभरात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत असल्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील नोकºयांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून, येणाºया काळात रोजगाराचा पर्याय म्हणून नोकºया उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तरुणांना नोकºया मिळविण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले आहे.सातपूर येथे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) माधव भांडारी यांच्या हस्ते ‘उद्यम कौस्तुभ २०१८’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते उद्योजकांशी संवाद साधत होते. माधव भांडारी म्हणाले, येणाºया काळात अंगभूत गुणवत्तांच्या आधारेच उद्योग व्यवसाय करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली ज्ञान संपन्नता ब्राह्मण समाजात असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे यापुढील काळात ज्ञान आणि शेती क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याने समाजाने ज्ञान कौशल्याच्या अधारे शेती सुधारणा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कृषिमाल प्रक्रिया उद्योग क्षेत्राकडे वळून अंतर्गत सहकार्याच्या भावनेतून समाज विकास साधण्याचे आवाहन भांडारी यांनी यावेळी केले. तर पुरस्काराला उत्तर देताना विश्वास चितळे यांनी भारताला दुग्ध उत्पादनात पुन्हा समृद्ध करण्याची गरज व्यक्त केली, तर एन.बी.एच. कुलकर्णी यांनी सध्याच्या काळात बोकाळलेल्या भ्रष्टाचार आणि शिक्षणाचे बाजारीकरण रोखून नवीन पिढी घडविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली.उद्यम कौस्तुभ, जीवन गौरव पुरस्कार प्रदानब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे चितळे उद्योगाचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्यासह एमएमजेसी सल्लागार कंपनीचे संस्थापक मकरंद जोशी, बांधकाम व्यावसायिक विवेक देशपांडे, उद्योजक नितीन केळकर व राजेंद्र बेडेकर यांचा उद्यम कौस्तुभ पुरस्कार २०१८ देऊन सन्मान करण्यात आला. समाजातील उद्योजकांना साहाय्य करणाºया ‘दे आसरा’ या समाजिक संस्थेलाही कौस्तूभ पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर भारत-इस्राइल संबंधांची पायाभरणी करणारे एन.बी.एच. कुलकर्णी यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.