शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सावधान! हेल्मेट नाही तर लायसन्स रद्द अन् आजपासून ५००चा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 14:49 IST

नाशिककरांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. बहुतांश नाशिककरांकडून हेल्मेटचा नियमित वापरदेखील केला जात आहे. ...

नाशिककरांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्याचा पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. बहुतांश नाशिककरांकडून हेल्मेटचा नियमित वापरदेखील केला जात आहे. मात्र काही बेशिस्तांकडून अद्यापही हेल्मेटसक्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना वठणीवर आणण्याकरिता पोलीस आुयक्त दीपक पाण्डेय यांनी आता दंडात्मक कारवाईचा आदेश दिले आहे. बेशिस्त दुचाकीचालकांना २२ डिसेंबर रोजीच अल्टिमेटम दिला होता. हे अल्टिमेटम आता संपले आहे. मंगळवारपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा ५०० तर दुसऱ्यांदा लायसन्स रद्द

वाहतूक शाखेकडून नव्या सुधारित आदेशाप्रमाणे पोलिसांकडून विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या बेशिस्त दुचाकीचालकांना ५००रुपयांचा दंड केला जाणार आहे. एकदा दंड भरल्यानंतरसुद्धा दुसऱ्यांदा पुन्हा जर विनाहेल्मेट दुचाकी चालविताना पोलिसांना आढळून आल्यास १ हजार रुपयांचा दंड तर केला जाईल, मात्र त्यासोबत ३ महिन्यांकरिता लायसन्सदेखील रद्द केले जाणार आहे.

दंड भरा, दुचाकीचा ताबा घ्या...!

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलान पद्धतीने करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची थकबाकी मोठी आहे. यामुळे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून ई चलानद्वारे जागेवर दंड केला जाऊन जोपर्यंत दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरत नाही, तोपर्यंत दुचाकीचा ताबा दिला जाणार आहे.

वर्षभरात ११६ दुचाकीस्वार ठार

हेल्मेटसक्ती अभियानांतर्गत १नोव्हेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१पर्यंत तब्बल १० हजार ५६१ दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात ११६ दुचाकी अपघातात १२४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १११ दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते.

शहरातील अपघातांमध्ये होणारे दुचाकीस्वारांचे मृत्यू रोखण्यासाठी हेल्मेटसक्ती आता अधिक कठोर केली जात आहे. सर्वांनी हेल्मेटचा वापर करत सुरक्षित प्रवास करावा हा यामागील उद्देश आहे.

-सीताराम गायकवाड, सहायक आयुक्त, वाहतूक शाखा