शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेशनवरील धान्य मिळेना आणि गरीबांचा धान्याचा घोर मिटेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:49 IST

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.स्वस्त दराने मिळणारे धान्य गरीबांना तेवढाच जगण्याचा आधार होता. पण तेही धान्य कोणालाही पुर्व सुचना न देता बंद करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वस्त धान्य दुकानदारांनी नेहमीच्या पध्दतीप्रमाणे अगोदर धान्याचे पैसे भरले असतांना देखील अजुन धान्यच आले नाहीत. धान्य बंद करायचे असते तर स्वस्त धान्य दुकानदारांना अगोदर पुर्व सुचनाच दिली असती. म्हणुन तर त्यांनी पैसे भरले.वास्तविक या केशरी कार्डांवर मागील भट नावाच्या पुरवठा विभागाच्या मुख्य लिपिकाने १२ आकडी नंबर न टाकल्याने प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारलेला नाही. त्यामुळे केशरी कार्ड धारकांना फ्री धान्य देखील मिळत नाही. अशा वेळेस एकीकडे लॉक डाउन कामधंदा नाही. त्र्यंबकेश्वर मंदीर बंद असल्याने दर्शन, धार्मिक विधी बंद अशा परिस्थितीत लोकांनी जगायचे कसे असा मुद्दा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदन देतांना मांडला. काही ग्राहकांच्या कार्डवर प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारला पण १२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.यावेळी तहसिलदारांना निवेदन देतांना कुणाल उगले, सुभाष सोनवणे, उल्हास तुंगार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरGovernmentसरकार