शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

कोणतेही सरकार कायम नसते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

नाशिक महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली असून, निवडणुकीला सामोरे जात असताना शाखाध्यक्षांना नियुक्त ...

नाशिक महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली असून, निवडणुकीला सामोरे जात असताना शाखाध्यक्षांना नियुक्त करून त्यांना बळकट करण्यात येणार आहे. त्यासाठी अमित ठाकरे, तसेच मनसेचे अन्य नेते नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी राजगडावर शाखाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांशी संवाद साधला. त्याचबराेबर कोणतेही सरकार कायम नसते, असे सांगूनच त्यांनी थेट सेनेच्या सरकारवरच प्रहार केला आहे. कोणतेही सरकार कायम नसते, कोण काम करते आणि काेण नाही, हे लाेक बघतच असतात, असे सांगून अमित ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकाळातील कामांना उजाळा दिला. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबई- पुणे आणि नाशिक येथे सर्वच ठिकाणी मनसे बैठका घेत आहे. मनसे आपले काम करीत आहे. मनसेने किती कामे केली आणि नंतर किती कामे मेंटेन झाली, हे नागरिक बघतच आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

पक्षाच्या दृष्टीने शाखाध्यक्षपद महत्त्वाचे असून, राज ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर आहेत. संघटना त्यातून बळकट होईल, असेही अमित ठाकरे म्हणाले. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अमेय खोपकर उपस्थित होते.

इन्फो..

‘सर्व विरोधकांचा हिशेब चुकता होणार’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी सर्व विरोधकांचा हिशेब चुकता करणार, असे फलक लावण्यात आल्याने राज ठाकरे या निवडणुकीत नक्की कोणाचा हिशेब चुकता करणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

-----