शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
4
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
5
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
6
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
7
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
8
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
9
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
10
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
11
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
12
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
13
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
14
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
15
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
16
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
17
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
18
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
19
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
20
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?

जिल्ह्यात सहा पुलांवरून अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’

By admin | Updated: June 13, 2017 01:05 IST

खबरदारी : दारणा, गोदावरी नदीवरील पुलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पावसाळ्याचे चार महिने जिल्ह्णातील धोकादायक झालेल्या पुलांवरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाला लेखी पत्राद्वारे दिली आहे. पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.जिल्ह्णातील निफाड, सिन्नर, इगतपुरी, सुरगाणा, नांदगाव तालुक्यांतील गोदावरी, दारणा, पांझण तसेच गाव नाल्यांवरील एकूण सहा पुलांवरून अवजड वाहतूक रोखण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील चांदोरी ते सायखेडा गावास जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल, दारणा नदीवरील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरील पूल, इगतपुरी तालुक्यातील दारणा नदीवरील घोटी गावाजवळील घोटी-सिन्नर राज्य मार्गावरील पूल, सौंदाणे-कळवण ते सुरगाणा राज्यमार्गावरील पूल, साक्री-कळवण राज्यमार्गावरील मनमाडजवळील नांदगाव तालुक्यातील पांझण नदीवरील पूल अशा एकूण सहा पुलांचा समावेश आहे. वरील सर्व पूल धोकादायक स्थितीत असून, या पुलांवरून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ जूनपासून या पुलांवरून अवजड वाहतूक थांबविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे; मात्र अद्याप घोटी-सिन्नर रस्त्यावरील पुलावरून तसेच सायखेडा रस्त्यावरील पुलासह अन्य पुलांवरूनदेखील अवजड वाहतूक सर्रासपणे सुरूच आहे. शहरासह जिल्ह्णात पावसाला सुरुवात झाली आहे. इगतपुरी, नांदगाव, सिन्नर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत असूनदेखील केवळ कागदावरच पुलांवरून अवजड वाहतूक बंद आहे; मात्र प्रत्यक्षात अवजड वाहतूक या धोकादायक पुलांवरून ‘जैसे थे’ सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बांधकाम राज्यमंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्षच्निफाड तालुक्यातील सायखेडा गावाला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाची गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे दुरवस्था झाली होती. यामुळे सदर पूल धोकादायक बनला आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम भवनामध्ये झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते; मात्र अद्याप पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसून लेखी पत्र काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने अवजड वाहतूक बंद केल्याचेही जाहीर केले आहे. याबाबत कुठलाही सूचना फलक पुलाच्या प्रारंभी लावण्याची तसदी अद्याप घेण्यात आली नसून अवजड वाहतूकही सुरूच आहे.