शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

मनपा शाळांच्या वेळा आता बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:48 IST

नाशिक : महापालिका शाळांच्या एकत्रीकरणानंतर सर्व शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या असल्या तरी त्याचे बरे-वाईट परिणाम लक्षात घेता महापालिकेने सध्या ज्या शाळा आठ ते दोन या वेळेत भरत होत्या त्या अकरा ते चार या वेळात भरविण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नाशिक : महापालिका शाळांच्या एकत्रीकरणानंतर सर्व शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या असल्या तरी त्याचे बरे-वाईट परिणाम लक्षात घेता महापालिकेने सध्या ज्या शाळा आठ ते दोन या वेळेत भरत होत्या त्या अकरा ते चार या वेळात भरविण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अक्षयपात्र योजनेलादेखील सदस्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. अर्थात त्यासंदर्भात महासभेतच अंतिम निर्णय होणार आहे.महापालिकेच्या शिक्षण समितीची बैठक सभापती प्रा. सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.९) पार पडली. यावेळी उपसभापती प्रतिभा पवार तसेच शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. महापालिकेच्या शाळांचे एकत्रीकरण करण्यात आले असले तरी काही शाळा वेगळ्या करून पूर्ववत करण्याची मागणीदेखील यावेळी सदस्यांनी केली, मात्र त्याबाबत शासनाला विनंती करून काही प्रमाणात बदल होऊ शकतील, असे प्रशासनाधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्यावर्षी तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी महापालिकेच्या शाळांचे एकत्रिकीकरण करून १२७ शाळांच्या एकूण ९० शाळा केल्या होत्या. त्यानंतर सर्वच प्राथमिक शाळा सकाळी असल्याने महापालिकेच्या शाळांची वेळदेखील सकाळीच करण्यात आली होती. मात्र, सकाळची वेळ ही सर्वच शाळा आणि पालकांसाठी सोयीची नाही. तसेच काही ठिकाणी मोलमजुरी करणाºया पालकांची मुले दुपारी शाळा सुटल्यानंतर मोकळी असतात, त्यामुळेदेखील सामाजिक प्रश्न निर्माण होत असतो. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या काही शाळांच्या वेळा बदला अशी सभापती सरिता सोनवणे यांची इच्छा होतीच, परंतु त्याच राहुल दिवे, चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड यांनीदेखील गरजेनुसार शाळांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार महापालिकेच्या काही शाळा सात ते बारा, काही आठ ते दोन या वेळात भरतात पैकी आठ वाजता भरणाºया सर्व शाळा ११ ते ४ या वेळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन याबाबत निर्णयाची माहिती देतानाच शाळेतील अडचणींचादेखील आढावा घेण्याचे ठरविण्यात आले.देशात अनेक ठिकाणी असलेली अक्षयपात्र ही मध्यान्ह भोजनाची योजना राबविण्याबाबत शासनाने गेल्यावर्षीच आदेश दिले आहेत. त्यात स्थानिक बचत गटांचा समावेश करून ही योजना राबविण्याचा मनोदय प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी व्यक्त केला. त्याला सर्वच सदस्यांनी मान्यता दिली. सदरच्या योजनेअंतर्गत अत्यंत आरोग्यदायी पध्दतीचे भोजन देता येते, टाटा किंवा इस्कॉन यांसारख्या संस्था त्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्य बचत गटात काम करणाºया महिलांपैकी स्वयंपाकी आणि मदतनीस म्हणून काही महिलांना मुलाखतीव्दारे निवडले जाऊ शकते. तसेच त्यांना किमान सहा ते दहा हजार रुपये वेतन मिळू शकते, असे देवरे यांनी सांगितले व ही मध्यान्ह भोजन योजना अमलात आल्यानंतर दोन हजार मुले पटसंख्येवर वाढू शकेल. शेवटी मुलांच्या भोजनासाठी ही योजना असून बचत गटांच्या रोजगारासाठी नव्हे असेही देवरे यांनी स्पष्ट केले. यावर चंद्रकांत खाडे यांनी इगतपुरी तालुक्यातील मुंडे गाव येथे सेंट्रल किचन योजना यशस्वीरीत्या राबविल्या जात आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी दौरा करण्याची सूचना केली. अक्षयपात्र योजनेअंतर्गत लवकरच सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आनंदवली येथील मनपाच्या शाळेच्या आवारात खासगी शाळा असून तेथे विद्यार्थ्यांना आमिष देऊन आपल्या शाळेत ओढण्यात येते. त्याचप्रमाणे महापालिकेच्या येथील शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी संतोष गायकवाड यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रतिभा पवार, सुदाम डेमसे यांनीही भाग घेऊन विविध सूचना केल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका