शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महापालिका नेमणार ‘स्वच्छतादूत’

By admin | Updated: December 22, 2015 00:07 IST

स्वच्छ भारत अभियान : कविता राऊतसह अनेक नावे चर्चेत

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत जनमानसात स्वच्छतेविषयीचा जागर होण्यासाठी आणि लोकांपर्यंत शासनाच्या योजना नेऊन पोहोचविण्यासाठी महापालिका ‘स्वच्छतादूत’ (ब्रॅण्ड अम्बॅसेडर) नेमणार असून, आंतरराष्ट्रीय धावपटू आणि सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतसह अनेक मान्यवरांची नावे चर्चेत आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेकडून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येणार आहेत. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे काम नुकतेच सुरू केले आहे. शिवाय, परिसर स्वच्छतेसंबंधी जनमानसात व्यापक स्तरावर जागृतीही केली जाणार आहे. महापालिकेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठी ‘स्वच्छतादूत’ नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नामवंत कलावंत, खेळाडू तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संपर्क साधून त्यांची सहमती मिळविली आहे. त्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारे चित्रकार, कलावंत आदिंचा समावेश असून, अनेक नावांची शिफारस येत्या महासभेवर करण्यात येणार आहे. त्यातील अंतिम नावांवर महासभा शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर हा एकच असला पाहिजे यावर महासभेचे एकमत होण्याची शक्यता असून, कविता राऊत यांच्याच नावावर सहमती होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.