शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नऊ गावे, दहा वाड्यांसाठी सहा टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:48 IST

चांदवड : तालुका परिसरात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. सध्या तालुक्यातील नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सी.पी. मोरे, सोमनाथ भोसले यांनी दिली.

ठळक मुद्देचांदवड : पाऊस न झाल्याने तालुक्यातील गावांना दिवसाआड पाणीपुरवठा टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चांदवड : तालुका परिसरात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. सध्या तालुक्यातील नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सी.पी. मोरे, सोमनाथ भोसले यांनी दिली.हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, उसवाड, नांदूरटेक, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ या नऊ गावांना, तर हिरापूरची धनगरवाडी, तळेगाव रोहीची दत्तवाडी, बजरंगनगर, घुमरे वस्ती, काजीसांगवीचे दुर्गानगर, नांदूरटेकची चिंचबारी, शिंगवेची झाल्टे व मढे वस्ती, रामवाडी, खताळ वस्ती, शिंदे व खताळ वस्ती, भाटगावची माळीवस्ती या दहा वाड्यांवर पाणीटंचाई असल्याने टॅँकर सुरू आहेत. काही गावांना दोन, तर काही गावांना टँकरची एक खेप सुरू आहे. तालुक्यातील काही गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे पाणीपुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले.गेल्या दोन वर्षांपूर्र्वी जून ते जुलै महिन्यापर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. तर यंदाच्या वर्षी पाणीटंचाई भीषण असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. टॅँकरची संख्या वाढणारगेल्या वर्षी बऱ्याच गावांमध्ये जलयुक्तची कामे झाल्याने परिसरातील बंधारे व विहिरींमध्ये पाणी टाकण्यात आले होते. मात्र यंदा मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. एप्रिल- मेमध्ये पाणीटंचाईचे भीषण चित्र असेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पाणीटंचाईची तीव्रता जसजशी वाढेल तशी टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.