शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 16:55 IST

कळवण : कोरोना महामारीने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कहराने जनसामान्यांना अक्षरशः हादरवून टाकले. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच कमी लोकसंख्या असली तरी बालापूर, अस्वली, शेपूपाडा, कुमसाडी, चाफापाडा, अंबापूर, भांडणे(हा), पिंपळे खुर्द, मोहबारी या नऊ गावांनी मात्र पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्देदोन्ही लाटांपासून सुरक्षित : प्रशासनाची मदत, नागरिकांच्या सहकार्याने शक्य

कळवण : कोरोना महामारीने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कहराने जनसामान्यांना अक्षरशः हादरवून टाकले. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच कमी लोकसंख्या असली तरी बालापूर, अस्वली, शेपूपाडा, कुमसाडी, चाफापाडा, अंबापूर, भांडणे(हा), पिंपळे खुर्द, मोहबारी या नऊ गावांनी मात्र पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे ही तिन्ही गावे आदिवासीबहुल आणि वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमधील आहेत. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभागाची मदत आणि नागरिकांचा विश्वास यामुळे हे शक्य झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली.सध्या जरी परिस्थिती नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी मात्र ग्रामीण व आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपूर्वी भयावह परिस्थिती झाली होती. संक्रमितांसह मृत्यूसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटला होता. मात्र, अशा परिस्थितीतही कळवण तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ गावांनी या घातक महामारीला गावाची सीमारेषा पार करू दिली नाही.त्या गावांमध्ये गोपाळखडी ग्रामपंचायतीमधील बालापूर(४६२), वाडी बु. ग्रामपंचायतीमधील असोली (२१२), बापखेडा ग्रामपंचायतीमधील शेपूपाडा(६०६), कुमसाडी(७७३), विरशेत ग्रामपंचायतीमधील चाफापाडा (५६०), वेरुळे ग्रामपंचायतीमधील अंबापूर (६६१),भांडणे (हा) ग्रामपंचायतीमधील भांडणे हातगड (५९८), धार्डेदिगर ग्रामपंचायतीमधील पिंपळे खुर्द(६१९), मोहबारी(६४३) या कमी लोकसंख्या असलेल्या नऊ गावांचा समावेश आहे.कोरोना रोगाची तीव्रता कमी व्हावी व रुग्णदर, मृत्यूदर वाढू नये म्हणून पहिल्या लाटेदरम्यान ग्रामपंचायत पातळीवर अनेक उपायोजना व कार्यक्रम राबवले गेले. कोरोनाची पहिली व दुसरी लाट थांबविता आली नाही. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण निघाले. त्यांच्यावर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचार करून रुग्ण बरेही झाले. आता या दुसऱ्या लाटेत तर तालुका अक्षरशः हादरून गेलेला होता; परंतु अशाही परिस्थितीत या नऊ गावांतील लोकांचे योग्य नियोजन तथा वेळीच घेतलेली खबरदारी, राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरिकांनी पाळलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचना आणि ग्रामस्थांचा दृढ निश्चय, सकारात्मक मानसिकता या सर्व बाबींमुळे तालुक्यातील नऊ गावे कोरोनामुक्त राहिली.यामध्ये प्रशासकीय यंत्रणेतील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तथा सहकार्य मोलाचे ठरले आहे. तसेच योग्यवेळी तपासणी, उपचार, टेस्टिंग, लसीकरण, जनजागृती यासुद्धा जमेच्या बाजू ठरलेल्या आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर काही बंधने घातली होती. त्यासाठी गावाच्या सर्व सीमा सील केल्या होत्या. गावात सोडियम हायपोक्लोराइची नियमित फवारणी करून गावाचे निर्जंतुकीकरण, संपूर्ण स्वच्छता, प्रत्येकाने मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक करणे या उपाययोजनांवर विशेष भर दिला होता.यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना विश्वासात घेत जनजागृती केली होती. या काळात मनात भीती असली तरी प्रत्येकाने स्वत:सोबत इतरांची काळजी घेतल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया या नऊ गावांमधील नागरिकांनी व्यक्त केल्या.नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची विशेष मदत झाली. यात ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी व आशा सेविकांनी सहकार्य केले. नागरिकांनी या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून काळजी घेतल्याने व उपाययोजनांचे पालन केल्याने हे शक्य झाले.- डॉ. सुधीर पाटील,तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीकळवण तालुक्यातील नऊ गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक, आशा सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडली. या नऊ गावांमधील नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी योग्य सहकार्य केले. सूचनांचे पालन केले. नागरिकांचा समजूतदारपणा व सहकार्याची भूमिका आदर्श ठरली.- नितीन पवार, आमदार, कळवण. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल