शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

पेठ, सुरगाण्याला प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:27 IST

नाशिक : आदिवासी भागातील नवजात बालकांना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरनंतर पेठ आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू केंद्र उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी नाशिक येथे केली. या विभागाचा लाभ परिसरातील आदिवासींनाही होणार असल्याचा विश्वास सावत यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देदीपक सावंत : बालमृत्यूमध्ये ५० टक्के घट

नाशिक : आदिवासी भागातील नवजात बालकांना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरनंतर पेठ आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू केंद्र उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी नाशिक येथे केली. या विभागाचा लाभ परिसरातील आदिवासींनाही होणार असल्याचा विश्वास सावत यांनी व्यक्त केला आहे.नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये योग्य उपचारांअभावी गरोदर माता व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये निदर्शनास होते येत होते. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधित तालुक्यांमध्ये विविध अभियानांच्या माध्यमातून या स्थितीवर मात करण्यासाठी सातत्याने चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्णात गेल्या वर्षभरात बालमृत्यूचे प्रमाण ५० टक्यांनी कमी झाले असून हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. सांवत यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याबाबत डॉ. सावंत यांनी चिंता व्यक्त केली. तसेच नागरिकांमध्ये साथीचे आजार होणार नाही, याबाबत जनजागृती करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. वेलनेस केंद्र स्थापणारराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात वेलनेस केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या वेलनेस केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन नंतर सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.