शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पेठ, सुरगाण्याला प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:27 IST

नाशिक : आदिवासी भागातील नवजात बालकांना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरनंतर पेठ आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू केंद्र उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी नाशिक येथे केली. या विभागाचा लाभ परिसरातील आदिवासींनाही होणार असल्याचा विश्वास सावत यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देदीपक सावंत : बालमृत्यूमध्ये ५० टक्के घट

नाशिक : आदिवासी भागातील नवजात बालकांना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरनंतर पेठ आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू केंद्र उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी नाशिक येथे केली. या विभागाचा लाभ परिसरातील आदिवासींनाही होणार असल्याचा विश्वास सावत यांनी व्यक्त केला आहे.नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये योग्य उपचारांअभावी गरोदर माता व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये निदर्शनास होते येत होते. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधित तालुक्यांमध्ये विविध अभियानांच्या माध्यमातून या स्थितीवर मात करण्यासाठी सातत्याने चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्णात गेल्या वर्षभरात बालमृत्यूचे प्रमाण ५० टक्यांनी कमी झाले असून हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. सांवत यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याबाबत डॉ. सावंत यांनी चिंता व्यक्त केली. तसेच नागरिकांमध्ये साथीचे आजार होणार नाही, याबाबत जनजागृती करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. वेलनेस केंद्र स्थापणारराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात वेलनेस केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या वेलनेस केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन नंतर सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.