शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

निळवंडे कालव्याची कामे वर्षभरात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:39 IST

सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या प्रश्नासंदर्भात लाभक्षेत्रातील सर्व पक्षांचे लोकप्रतीनिधी व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कालव्यांच्या संदर्भात लाभक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली होती. या बैठकीत बोलताना आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, धरणाच्या डाव्या कालव्यावर सिन्नर तालुक्यातील पाथरे खु, वारेगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी, कहांडळवाडी या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील १४५६.६५ हेक्टर क्षेत्र येत असून या कालव्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे. या कालव्यांची कामे लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून या दुष्काळी भागातील शेतकºयांना दिलासा मिळेल. ४८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कालव्यांची कामे पूर्ण करण्याच्या व कालवे बंदीस्त पाईप लाईनद्वारे न करता खुल्या पद्धतीने करण्याची सूचना जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. सद्य स्थितीत धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून कालवे नसल्यामुळे शेतकºयांना पाणी मिळत नाही. सध्याच्या मंजूर प्रकल्पातील खर्चानुसार पारंपरिक कालवेच सरकारला परवडनारे असुन त्यामुळे उपलब्ध निधी नुसार त्यांची कामे तातडीने करण्याच्या सूचना अधिकाºयांना यावेळी नामदार शिवतारे यांनी दिल्या. सबंधित न्यू एशियन कंपनीचे ठेकेदार यांनी वर्षभरामध्ये कालव्यांची कामे पुर्ण करावित अन्यथा त्यांचेवर कारवाई करण्याचा इशारा शिवतारे यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौºयानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार नामदार शिवतारे स्वत: अकोले तालुक्यातील शेतकºयांना भेटणार असून आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरु करण्यात येतील.यावेळी बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार स्नेहलताताई कोल्हे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके तसेच निळवंडे पाट ङ्क्त पाणी कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासह अहमदनगरचे अधीक्षक अभियंता श्रीमती अलका अहिरराव, संगमनेरचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल, कार्यकारी अभियंता जगताप तसेच उत्तर महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

टॅग्स :Waterपाणी