शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

निळवंडे कालव्याची कामे वर्षभरात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:39 IST

सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या प्रश्नासंदर्भात लाभक्षेत्रातील सर्व पक्षांचे लोकप्रतीनिधी व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कालव्यांच्या संदर्भात लाभक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली होती. या बैठकीत बोलताना आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, धरणाच्या डाव्या कालव्यावर सिन्नर तालुक्यातील पाथरे खु, वारेगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी, कहांडळवाडी या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील १४५६.६५ हेक्टर क्षेत्र येत असून या कालव्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे. या कालव्यांची कामे लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून या दुष्काळी भागातील शेतकºयांना दिलासा मिळेल. ४८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कालव्यांची कामे पूर्ण करण्याच्या व कालवे बंदीस्त पाईप लाईनद्वारे न करता खुल्या पद्धतीने करण्याची सूचना जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. सद्य स्थितीत धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून कालवे नसल्यामुळे शेतकºयांना पाणी मिळत नाही. सध्याच्या मंजूर प्रकल्पातील खर्चानुसार पारंपरिक कालवेच सरकारला परवडनारे असुन त्यामुळे उपलब्ध निधी नुसार त्यांची कामे तातडीने करण्याच्या सूचना अधिकाºयांना यावेळी नामदार शिवतारे यांनी दिल्या. सबंधित न्यू एशियन कंपनीचे ठेकेदार यांनी वर्षभरामध्ये कालव्यांची कामे पुर्ण करावित अन्यथा त्यांचेवर कारवाई करण्याचा इशारा शिवतारे यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौºयानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार नामदार शिवतारे स्वत: अकोले तालुक्यातील शेतकºयांना भेटणार असून आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरु करण्यात येतील.यावेळी बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार स्नेहलताताई कोल्हे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके तसेच निळवंडे पाट ङ्क्त पाणी कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासह अहमदनगरचे अधीक्षक अभियंता श्रीमती अलका अहिरराव, संगमनेरचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल, कार्यकारी अभियंता जगताप तसेच उत्तर महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

टॅग्स :Waterपाणी