शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे कालव्याची कामे वर्षभरात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:39 IST

सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

सिन्नर : तालुक्यातील ६ गावांसह अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे कालवे वर्षभरात पूर्ण होतील अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या प्रश्नासंदर्भात लाभक्षेत्रातील सर्व पक्षांचे लोकप्रतीनिधी व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कालव्यांच्या संदर्भात लाभक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली होती. या बैठकीत बोलताना आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, धरणाच्या डाव्या कालव्यावर सिन्नर तालुक्यातील पाथरे खु, वारेगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी, कहांडळवाडी या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील १४५६.६५ हेक्टर क्षेत्र येत असून या कालव्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे. या कालव्यांची कामे लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून या दुष्काळी भागातील शेतकºयांना दिलासा मिळेल. ४८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कालव्यांची कामे पूर्ण करण्याच्या व कालवे बंदीस्त पाईप लाईनद्वारे न करता खुल्या पद्धतीने करण्याची सूचना जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. सद्य स्थितीत धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून कालवे नसल्यामुळे शेतकºयांना पाणी मिळत नाही. सध्याच्या मंजूर प्रकल्पातील खर्चानुसार पारंपरिक कालवेच सरकारला परवडनारे असुन त्यामुळे उपलब्ध निधी नुसार त्यांची कामे तातडीने करण्याच्या सूचना अधिकाºयांना यावेळी नामदार शिवतारे यांनी दिल्या. सबंधित न्यू एशियन कंपनीचे ठेकेदार यांनी वर्षभरामध्ये कालव्यांची कामे पुर्ण करावित अन्यथा त्यांचेवर कारवाई करण्याचा इशारा शिवतारे यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौºयानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार नामदार शिवतारे स्वत: अकोले तालुक्यातील शेतकºयांना भेटणार असून आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरु करण्यात येतील.यावेळी बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार स्नेहलताताई कोल्हे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके तसेच निळवंडे पाट ङ्क्त पाणी कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासह अहमदनगरचे अधीक्षक अभियंता श्रीमती अलका अहिरराव, संगमनेरचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल, कार्यकारी अभियंता जगताप तसेच उत्तर महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

टॅग्स :Waterपाणी