शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

रात्री बेरात्री पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:03 IST

कळवण : दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे. मात्र कातळगाव येथील आदिवासी बांधवानी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करून गावात पाणीच नसल्याने पाणी आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

ठळक मुद्देकळवण : टँकरमुक्त तालुक्यात कातळगावला टँकरची मागणी

कळवण : दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे. मात्र कातळगाव येथील आदिवासी बांधवानी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करून गावात पाणीच नसल्याने पाणी आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.टँकरमुक्त कळवण तालुका अशी ओळख असलेल्या या तालुक्यात आता टँकरची मागणी होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत मोहनदरी अंतर्गत कातळगावमध्ये गेल्या मिहन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई असून महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे शिवाय रात्री बेरात्री फक्त पाण्यासाठी दीड किलोमीटर भटकंती करावी लागत असल्याची कैफियत कातळगावच्या गुलाबीबाई जोपळे व अरु णाबाई जोपळे यांनी मांडली.जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी यांच्या नेतृत्वाखाली कातळगाव येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया व तहसीलदार बंडू कापसे यांची भेट घेऊन कातळगाव येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले असून सध्या विहीर व बोअरवेलला पाणी नसल्याने महिलांनी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कातळगावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून रात्री एक ते दीड किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.पाण्याचा उग्र प्रश्न निर्माण झाल्याने रोजंदारीवर कामावर जाणार्यांना काम सोडून पाण्यासाठी घरी थांबून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा लागत आहे. त्यामुळे कातळगावचा पाचवीला पुजलेला पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पाणी प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी कातळगाव येथील शिष्टमंडळाने केली.यावेळी शिष्टमंडळात संजय चव्हाण, रवींद्र चव्हाण, दिलीप जोपळे, गुलाब बिहरम, लक्ष्मण हाडस, देविदास जोपळे, पोपट पवार, उत्तम खांडवी, गोविंद बागुल, परशराम गवळी, कृष्णा गवळी, बापू चव्हाण, पंडित बिहरम, गुलाबीबाई जोपळे, अरु ण जोपळे, शांताराम बिहरम, दत्तू जोपळे, शिवाजी चव्हाण, आनंदा जोपळे, सुरेश चव्हाण, प्रभू चव्हाण आदी सहभागी झाले होते.ग्लासभर पाण्यासाठी भटकंती -शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम, सुफलाम आण िपाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे ,परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. आदीवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन -चार किलोमीटरच्या परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे. मात्र गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. आदिवासी वस्ती- पाडे, गाव-वस्तींना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; पंरतु विहीर तसेच विंधन विहिरींना पाणी नाही. कारण या भागातील नैसिर्गक नदी-नाले, बंधारे, तलाव, पाणी अडवून जिरवण्याचे छोटे बंधारे, विहिरी कोरड ठाक पडलेले आहेत,शिरसमणीचा दिनक्र म पाण्याभीवती -शिरसमनी गावात तर गावाजवळील शेतात शेतकर्?याचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी सकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानिसकता झालेली आहे. पण विखुरलेल्या लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींना देखील कसरत करावी लागत असून यंत्रणेला ग्रामस्थांना तोंड देतांना नाकीनऊ आले आहे . ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे दर दिवशी अर्धा तास पाणी नळांना दिले जाते. काही भागात ते मिळते तर काही भागात तेही मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपल्यावर पाणी पुरवताना अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागत आहे.