शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बेघरांसाठी उभारणार रात्र निवारा केंद्र

By admin | Updated: September 20, 2016 01:33 IST

महासभेवर प्रस्ताव मंजूर : दोन ठिकाणे होणार निश्चित

नाशिक : केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गरीब-गरजू बेघर व्यक्तींसाठी रात्र निवारा केंद्र उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला असून, लवकरच दोन ठिकाणे निश्चित केली जाणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.केंद्र शासनाने सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना बंद करून त्याऐवजी दीनदयाळ अंत्योदय योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघरांसाठी निवारा केंद्र गरजू व गरीब व्यक्तींसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ५० ते १०० बेघर व्यक्तींना आश्रय देण्याकरिता एक निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. त्यानुसार, नगर परिषद प्रशासन संचालनालयाने नाशिक महापालिकेलाही सन २०१६-१७ या वर्षात दोन शहरी बेघर निवारा केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट्य दिलेले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासंबंधी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सहा ठिकाणे प्रस्तावित करण्यात आली. त्यातील दोन ठिकाणी निवारा केंद्र उभारले जाणार आहेत. रात्र निवारा केंद्र बांधण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार असून, केंद्राचे बांधकाम झाल्यानंतर पाच वर्षांसाठी देखभाल खर्च व त्या अनुषंगिक खर्च हा दीनदयाळ अंत्योदय योजनेतून करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी शासनाकडून निधी न मिळाल्यास त्याचा खर्च महापालिकेला करायचा आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सोमवारच्या महासभेत मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)निवारा केंद्रासाठी प्रस्तावित ठिकाणेस. नं. १८७ ‘ड’मधील जुन्या व्यायामशाळेच्या जागेत (सिन्नर फाटा)स. नं. २६९ मधील मनपाच्या जागेत (रेल्वे टर्मिनसजवळ)नाशिकरोड विभागीय कार्यालय जुनी इमारत, स्टेशनरोड.स. नं. ३३५ पंचवटी कुष्ठधामजवळ मनपाची ११ एकर जागा.मनपा इमारत दुसरा मजला, नारोशंकर मंदिरासमोर.कुष्ठधाम इमारत, संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ, तपोवन.