शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

बेघरांसाठी उभारणार रात्र निवारा केंद्र

By admin | Updated: September 20, 2016 01:33 IST

महासभेवर प्रस्ताव मंजूर : दोन ठिकाणे होणार निश्चित

नाशिक : केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गरीब-गरजू बेघर व्यक्तींसाठी रात्र निवारा केंद्र उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला असून, लवकरच दोन ठिकाणे निश्चित केली जाणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.केंद्र शासनाने सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना बंद करून त्याऐवजी दीनदयाळ अंत्योदय योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघरांसाठी निवारा केंद्र गरजू व गरीब व्यक्तींसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ५० ते १०० बेघर व्यक्तींना आश्रय देण्याकरिता एक निवारा केंद्र उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. त्यानुसार, नगर परिषद प्रशासन संचालनालयाने नाशिक महापालिकेलाही सन २०१६-१७ या वर्षात दोन शहरी बेघर निवारा केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट्य दिलेले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. त्यासंबंधी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सहा ठिकाणे प्रस्तावित करण्यात आली. त्यातील दोन ठिकाणी निवारा केंद्र उभारले जाणार आहेत. रात्र निवारा केंद्र बांधण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार असून, केंद्राचे बांधकाम झाल्यानंतर पाच वर्षांसाठी देखभाल खर्च व त्या अनुषंगिक खर्च हा दीनदयाळ अंत्योदय योजनेतून करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी शासनाकडून निधी न मिळाल्यास त्याचा खर्च महापालिकेला करायचा आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सोमवारच्या महासभेत मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)निवारा केंद्रासाठी प्रस्तावित ठिकाणेस. नं. १८७ ‘ड’मधील जुन्या व्यायामशाळेच्या जागेत (सिन्नर फाटा)स. नं. २६९ मधील मनपाच्या जागेत (रेल्वे टर्मिनसजवळ)नाशिकरोड विभागीय कार्यालय जुनी इमारत, स्टेशनरोड.स. नं. ३३५ पंचवटी कुष्ठधामजवळ मनपाची ११ एकर जागा.मनपा इमारत दुसरा मजला, नारोशंकर मंदिरासमोर.कुष्ठधाम इमारत, संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ, तपोवन.