शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रात्र काढावी लागली घराबाहेर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:07 IST

मुसळधार पावसाचा फटका नंदिनी लगतच्या मिलिंदनगर भागातील रहिवाशांनाही बसला. शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. पुरामुळे घरातील कपडे, भांडी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले.

सिडको : मुसळधार पावसाचा फटका नंदिनी लगतच्या मिलिंदनगर भागातील रहिवाशांनाही बसला. शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. पुरामुळे घरातील कपडे, भांडी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले.शासनाने थोड्या प्रमाणात धान्य देऊन सोपस्कार पार पाडले असले तरी ज्यांना मदत मिळणे गरजेचे त्यांना न मिळता इतरांनाच लाभ मिळत असल्याची भावना व्यक्त करतानाच शासनाने अधिकची मदत करण्याची अपेक्षाही येथील रहिवाशांनी व्यक्त केली.तिडकेनगर जवळील मिलिंदनगर भागात पंधराशेहून अधिक कुटुंबे राहात असून, याच मिलिंदनगर भागातून नंदिनी नदी वाहत असल्याने नदीलगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. नंदिनीला काही भागात संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात त्याठिकाणाहून थेट नागरिकांच्या घरात पाणी शिरते. येथील शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील कपडे, भांडी तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाले. पुरामुळे काही नागरिकांच्या घरात पाच फुटापर्यंत पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. तर सीताबाई मेढे यांचे पत्र्याचे घर संसारोपयोगी साहित्यासह पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त नागरिकांना दहा किलो तांदूळ व दहा किलो गहू दिले असले तरी यात काही नागरिकांनी आपल्याला मदत मिळाली नसल्याचे सांगितले.तसेच सुरेश लहांगे, गंगाधर पवार, संदीप साबळे, प्रमोद पानपाटील, विशाल मोहिते, विठाबाई हलवर, किरण हलवर, नईम शेख, इंदूबाई कांबळे, विजयमाला गजरे, मंगल गोरवे, सुमन लिलके, शेख यांच्याही घरात पावसाचे पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी चिखल व घाण साचली असून, अनेकांना थंडी-ताप व साथीचे आजार झाल्याचे नागरिकांनी सांगितले.नंदिनी नदीलगतच घर असल्यामुळे पुरामध्ये वाहून गेले. घराचे नुकसान तर झालेच, परंतु संसार पाण्यात वाहून गेल्याने सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. अंगावर असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त काहीच शिल्लक राहिले नसून शासनाने मदत करावी.-सीताबाई मेढे, रहिवासीघरामध्ये पाच फुटांपर्यंत पाणी आले होते. घरामध्ये पाणी शिरत असल्याचा अंदाज घेत कुलूप लावून संपूर्ण कुटुंब घराबाहेर आले. दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शासनाने अधिक मदत द्यावी.-भारती जाधव, रहिवासी

 

 

 

टॅग्स :floodपूरRainपाऊस