शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

रात्र काढावी लागली घराबाहेर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:07 IST

मुसळधार पावसाचा फटका नंदिनी लगतच्या मिलिंदनगर भागातील रहिवाशांनाही बसला. शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. पुरामुळे घरातील कपडे, भांडी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले.

सिडको : मुसळधार पावसाचा फटका नंदिनी लगतच्या मिलिंदनगर भागातील रहिवाशांनाही बसला. शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. पुरामुळे घरातील कपडे, भांडी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले.शासनाने थोड्या प्रमाणात धान्य देऊन सोपस्कार पार पाडले असले तरी ज्यांना मदत मिळणे गरजेचे त्यांना न मिळता इतरांनाच लाभ मिळत असल्याची भावना व्यक्त करतानाच शासनाने अधिकची मदत करण्याची अपेक्षाही येथील रहिवाशांनी व्यक्त केली.तिडकेनगर जवळील मिलिंदनगर भागात पंधराशेहून अधिक कुटुंबे राहात असून, याच मिलिंदनगर भागातून नंदिनी नदी वाहत असल्याने नदीलगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. नंदिनीला काही भागात संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात त्याठिकाणाहून थेट नागरिकांच्या घरात पाणी शिरते. येथील शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील कपडे, भांडी तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाले. पुरामुळे काही नागरिकांच्या घरात पाच फुटापर्यंत पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. तर सीताबाई मेढे यांचे पत्र्याचे घर संसारोपयोगी साहित्यासह पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त नागरिकांना दहा किलो तांदूळ व दहा किलो गहू दिले असले तरी यात काही नागरिकांनी आपल्याला मदत मिळाली नसल्याचे सांगितले.तसेच सुरेश लहांगे, गंगाधर पवार, संदीप साबळे, प्रमोद पानपाटील, विशाल मोहिते, विठाबाई हलवर, किरण हलवर, नईम शेख, इंदूबाई कांबळे, विजयमाला गजरे, मंगल गोरवे, सुमन लिलके, शेख यांच्याही घरात पावसाचे पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी चिखल व घाण साचली असून, अनेकांना थंडी-ताप व साथीचे आजार झाल्याचे नागरिकांनी सांगितले.नंदिनी नदीलगतच घर असल्यामुळे पुरामध्ये वाहून गेले. घराचे नुकसान तर झालेच, परंतु संसार पाण्यात वाहून गेल्याने सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. अंगावर असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त काहीच शिल्लक राहिले नसून शासनाने मदत करावी.-सीताबाई मेढे, रहिवासीघरामध्ये पाच फुटांपर्यंत पाणी आले होते. घरामध्ये पाणी शिरत असल्याचा अंदाज घेत कुलूप लावून संपूर्ण कुटुंब घराबाहेर आले. दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शासनाने अधिक मदत द्यावी.-भारती जाधव, रहिवासी

 

 

 

टॅग्स :floodपूरRainपाऊस