शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निफाडचा पारा ६ अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:39 IST

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरुवारी दि २० रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ...

निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरुवारी दि २० रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे.बुधवारी दि १९ रोजी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले होते . मात्र थंडीने आपलारु द्रावतार वाढवत नेल्याने गुरु वारी दि २० रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ६ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने निफाडकरांना गारठून टाकले होते. तालुक्यात उसतोडीसाठी आलेल्या ऊस तोड कामगारांनी , शेतकऱ्यांनी , नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता.----------------द्राक्ष बागायतदार चिंंतीतथंडी गहू ,कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे मात्र या वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे पडणे ,फुगवण कमी होणे, द्राक्षाच्या वेलींना अन्न पुरवठा कमी होणे आदी परिणाम होणार असल्याने द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सकाळी भरणाºया शाळांमध्ये विद्यार्थी उशिराने येत होते . थंडीचा कडाका इतका जास्त होता की दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.-----------------मागील वर्षी सुद्धा निफाड तालुक्याला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले होते. विशेष म्हणजे मागील वर्षातील सर्वात नीचांकी तापमान ६ अंश सेल्सिअस दि २५ व २६ जानेवारी रोजी झाले होत. त्यामुळे मागील वर्षी असलेल्या नीचांकी तापमानाचा विक्र म यावर्षी मोडला जातो काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

टॅग्स :Nashikनाशिक