बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील मध्य रेल्वेच्या अस्वली रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी एका युवकाने इगतपुरीकडून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीखाली येऊन आत्महत्त्या केली. विजय गरुड (२५) असे त्या युवकाचे नाव असून नुकताच दहा दिवसांपूर्वी विजयचा विवाह झाला होता. अस्वली स्टेशनचे स्टेशन मास्तर एस. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी इगतपुरीकडून भुसावळकडे एक मालगाडी जात होती. या मालगाडीखाली डाऊन मार्गावर स्टेशनच्या अगदी पुढे गाडीची वाट बघत असलेल्या विजयने अचानक रेल्वे मार्गावर गाडीसमोर बसून घेतले. त्यात त्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. रेल्वेमार्गाकडे विजय फोनवर बोलत बोलत चालला होता असे काहींनी सांगितले परंतु तो आत्महत्त्या करील असे वाटले नव्हते असे ते म्हणाले. सदर गाडी पास होत नाही तोच मालगाडीचे ड्रायव्हर आर. के. मेघवाल आणि गार्ड एच. एस. यंदे यांचे मेसेज स्टेशनला आले. विजयचा दहा दिवसांपूर्वी विवाह झाला होता. आत्महत्त्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत नाशिकरोड रेल्वे पोलीस व वाडीवऱ्हे पोलिसांना घटनेची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. (वार्ताहर)
नवविवाहित तरु णाची आत्महत्त्या
By admin | Updated: June 12, 2016 23:27 IST