उगवेल नवा सूर्य...आयुष्याची सायंकाळ झाली असली, सूर्य मावळतीला गेला असला, तरी उजेडाची आस संपलेली नाही... अवतीभोवती दारिद्र्याचा अंधार गडद झाला म्हणून काय झाले? त्यावर मात करण्यासाठी कंदिलाची इवलीशी आशेची ज्योत पुरेशी आहे. नव्या वर्षात नवा सूर्य उगवेल, अंधार सरेल अन् दिवसही पालटतील, असाच विचार बहुधा झोपडीतली ही वृद्धा सरत्या वर्षाच्या सायंकाळी करीत नसेल? नाशिकजवळच्या पळसे येथील दृश्य.
उगवेल नवा सूर्य...
By admin | Updated: December 31, 2014 01:59 IST