शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

संगणक युगात नेटीकेट््सची गरज

By admin | Updated: February 5, 2017 22:44 IST

सीएमसीएस महाविद्यालय : ‘सायबर सिक्युरिटी’ राष्ट्रीय चर्चासत्रातील सूर

नाशिक : सायबर गुन्ह्यांमध्ये विविध स्तरांतील व्यक्तींकडून इंटरनेटचा वापर करताना झालेली अतिघाई किंवा घ्यावयाची काळजी याबाबतची उदासीनता आढळून येते. इंटरनेटच्या चुकीच्या व अतिवापरामुळे पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कलह वाढत असून, आजच्या संगणकधारित युगात मुलांवर संस्काराबरोबरच सायबर संस्कार करणे तसेच एटीकेट्सबरोबरच नेटीकेट्स शिकविणे व कॅरेक्टरबरोबरच सायबर कॅरेक्टर घडविणे गरजेचे असल्याचा सूर ‘सायबर सिक्युरिटी : गरज प्रत्येकाची’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला.  सीएमसीएस महाविद्यालयात सुरू असलेल्या दोनदिवसीय चर्चासत्राचे तृतीय सत्र शनिवारी पार पडले. या चर्चासत्राच्या अध्यक्षपदी मविप्रचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्यासह अ‍ॅड. सुधीर कोतवाल व अ‍ॅड. नवनाथ गोरवाडकर यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान वापरण्यासंबंधीच्या कायद्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे घडणारे सायबर गुन्हे याविषयी माहिती दिली. तसेच सायबर गुन्हे व इतर प्रकारचे गुन्हे यात फार मोठी तफावत समजावून सांगतानाच अशा गुन्ह्यांमध्ये व्यक्तीच्या मालमत्तेस तसेच प्रतिमेस होणारी हानी याविषयीही माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर अहेर, आयोजक समितीचे सदस्य प्रा. प्रशांत बनकर, प्रा. प्रशांत कदम, प्रा. मदन हळदे, प्रा. अमित मोगल, प्रा. उदय चौधरी, प्रा. एस. एस. कुलकर्णी, प्रा. ए. एस. बच्छाव, प्रा. एस. व्ही. श्रीमाळी, प्रा. व्ही. टी. धोकरट आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत निकम यांनी केले. (प्रतिनिधी)