शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

निव्वळ नकारात्मकता कारणीभूत

By admin | Updated: May 18, 2014 00:06 IST

नाशिक : ‘जे पेरले तेच उगवते’ हेच आजवर सिद्ध होत आले आहे. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास त्याला उपरोक्त पंक्तीच पुरेशा आहेत.

 

नाशिक : ‘जे पेरले तेच उगवते’ हेच आजवर सिद्ध होत आले आहे. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास त्याला उपरोक्त पंक्तीच पुरेशा आहेत. काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रिपद पाठोपाठ सलग पंधरा वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिमतीला असताना राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षावर भुजबळ यांची पकड असणे ओघाने आले. अशा वेळी पक्ष संघटनेचे पद असो वा शासन पातळीवरील लाभ असो, साहजिकच भुजबळ यांचा शब्द प्रमाणच ठरला व त्यातूनच राजी-नाराजीचे राजकारण तब्बल पंधरा वर्षे चालले हे नव्याने सांगणे नको. सत्ता-संपत्तीची धुंदी व दिमतीला हुजर्‍यांच्या फौजेमुळे बेपवाई व बेफिकिरी इतकी वाढीस लागली की, त्यातून स्वकीयांचे खच्चीकरणाचे राजकारणही खेळले गेले. त्यासाठी चेल्या- चपाट्यांना कधी त्यांच्या अंगावर सोडण्यात आले तर कधी याच चेल्या-चपाट्यांना अंगाखाली घेण्यात आले. अगदीच स्पष्ट भाषेत सांगायचे तर ज्या मराठा समाजावर आज आगपाखड केली जाते, त्या समाजाला डिवचण्यास सुरुवात कोठून झाली याचा विचार जरी केला तरी त्यातून सारे काही स्पष्ट व्हावे. जे जे विरोधक आहेत असे वाटू लागले, त्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न गेल्या पंधरा वर्षांच्या काळात करण्यात आले. त्यात मराठा, वंजारी आदि समाजाची नावे घेतली जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या सार्‍या गोष्टींचा हिशेब चुकता करण्याची तयारी अगदी निवडणूक जाहीर होण्यापूवीर् पासूनच मतदारांनी केली असेल तर त्यात दोष कोणाचा ? नाही म्हटले तरी, अगदीच नकारात्मका नको म्हणून मराठा समाजाला आमदारकी व वंजारी समाजाला म्हाडाचे सभापतिपद देऊन आपल्याविषयीची नाराजी घालविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न भुजबळ यांच्याकडून करण्यात आला, मात्र असे करताना पुन्हा एकवार राजी-नाराजी ओढवून घेण्यात आली. जातीय समीकरणांचा परिणाम राजकारणात व सत्ताकारणात आपलाच प्रभाव असावा यासाठी भुजबळ यांच्याकडून गेल्या पंधरा वर्षांत करण्यात आलेल्या प्रयत्नांतूनच जातीय समीकरणांचा पाया घातला गेला. त्यामुळे विशिष्ट समाजाचा त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कायम राहिला. मात्र याच दरम्यान ज्या समाजाचे ते राष्टÑीय नेते बनू पाहात अशा समाजाप्रतीही त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यातून त्यांनीच जन्माला घातलेली समता परिषद या निवडणुकीपासून अगदीच अलिप्त राहिली, तर पक्षातही संघटनेवरील निष्ठेपेक्षा व्यक्तिगत निष्ठेलाच आजवर प्राधान्य देण्याची भूमिका राहिल्याने पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ताही भुजबळ यांच्यापासून दुरावला. पेरले तेच उगवले आजवरच्या राजकारणात भुजबळ यांनी जे जे डाव खेळले त्याचा हिशेब चुकता करणार्‍यांचीच संख्या अधिक आहे. एकेकाळी पक्ष संघटनेची धुरा ज्याच्या हाती सोपवून मांडीवर बसवले ते गजानन शेलार विरोधात गेले, तर मित्र पक्षाचे सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्याशी घेतलेला पंगाही त्यांना महाग पडला. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या मतदारसंघात कामे करण्यावरून निर्माण झालेला बेबनावही नाराजीचे कारण ठरले. चेल्या-चपाट्यांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करण्यात आलेले राजकारण व त्यातून नाराज झालेल्यांनी आपला राग थेट भुजबळ यांच्यावरच काढला. त्यांचे समाजातील स्थान काय मराठा समाजाची नाराजी घालविण्यासाठी जयंत जाधव यांना आमदार म्हणून निवडून आणणे व वंजारी समाजाचे नरेंद्र दराडे यांची म्हाडावर नेमणूक करण्यात आली असली तरी, या जाधव व दराडे हे त्या त्या समाजाचे चेहरे व नेते नव्हेत हेदेखील लक्षात घेण्यात आले नाही.