शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ना मिळाले गाढव अन् ना मिळाला जावई..!  आनंदावर विरजण, प्रथा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2023 16:17 IST

कोरोनाच्या काळात ही धिंड निघाली नाही. त्या अगोदर काही कारणास्तव धिंड निघाली नाही, असे दोन तीन अपवाद वगळता आजतागायत अखंडपणे जावयाची धिंड काढण्यात वडांगळीकर यशस्वी ठरले.

- प्रफुल्ल बकरे

वडांगळी (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील ब्रिटिश काळापासून चालत आलेली ‘जावयाची गाढवावरून धिंड’ प्रथा यावेळी खंडित झाली. सुमारे दीड शतकापासून वडांगळी ग्रामस्थ जावयाची गाढवावर बसवून सवाद्य ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून नंतर त्याचा यथोचित सत्कार करून बोळवण करतात. यावर्षी मात्र वडांगळीकरांना ना गाढव मिळाले ना जावई. त्यामुळे धिंडीचा आनंद घेणाऱ्या वडांगळीकरांच्या आनंदावर विरजण पडले.

कोरोनाच्या काळात ही धिंड निघाली नाही. त्या अगोदर काही कारणास्तव धिंड निघाली नाही, असे दोन तीन अपवाद वगळता आजतागायत अखंडपणे जावयाची धिंड काढण्यात वडांगळीकर यशस्वी ठरले. परंतु यावेळी कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. परंतु ही परंपरा खंडित झाल्याने अनेकांना नवल वाटले. ज्या धिंडीची महाराष्ट्रात नामांकित वृतवाहिन्या,वृत्तपत्रे,समाज माध्यमे आवर्जून दखल घेतात अशी प्रथा अचानक खंडित झाली.

होळी ते रंगपंचमी या काळात कोणत्याही परिस्थितीत गाढव शोधून आणून येनकेन प्रकारे जावई शोधण्यात येऊन त्याची धिंड काढली जातेच. पण यावेळेस तरुणांची उदासीनता, ग्रामस्थांच्या सहभागाचा अभाव आणि महत्त्वाचे कारण आज सिन्नरला खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे मतदान असल्याने वडांगळीमधील सरपंच, आजी माजी आमदारांचे समर्थक, कार्यकर्ते सर्वच निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गेले होते. 

आजी-माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे दोन्ही गटांचे समर्थक सिन्नरला सकाळपासूनच तळ ठोकून होते. त्यामुळे गावात गाढव व जावई शोधण्यासाठी कोणतीच यंत्रणा कामाला लागली नाही. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे धिंडीसाठी खर्च कोणी करायचा याची चर्चा गावात होती. ग्रामस्थांनी मनावर घेतले असते तर त्यांच्या ट्रस्टमधून पैसे देता आले असते, नाहीतर या पाच सहा दिवसांत वर्गणी करून मोठा निधी उभारता आला असता. पण ग्रामस्थांसह तरुणांची मानसिकता नसल्यामुळे परंपरा मोडीत निघण्याची नामुष्की वडांगळीकरांवर ओढवली ही खंत आहे.

वडांगळीमध्ये मोठ्या प्रमाणात सतीमाता सामतदादा तसेच अनेक सामुदायिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होतात. त्यासाठी निधी कमी पडत नाही. मग धिंडीसाठीच कोठे घोडे अडले हा संशोधनाचा भाग आहे. सकाळपासून वडांगळीत निघणाऱ्या जावयाच्या धिंडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, रंगपंचमी संपली पण ना गाढव मिळाले ना जावई.

टॅग्स :Nashikनाशिक