शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

ना कर्जमाफीचा लाभ ,ना निसर्गाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 00:02 IST

जळगाव नेऊर : मोठा गाजावाजा करून हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने शेतकरी सुखावला होता. याबरोबरच मृग नक्षत्रात झालेल्या ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची व्यथा : दुबार पेरणीचे संकट

जळगाव नेऊर : मोठा गाजावाजा करून हवामान खात्याने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने शेतकरी सुखावला होता. याबरोबरच मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील शेतकऱ्यांनी उधार, उसनवारीवर बियाणे, खते खरेदी करून शेतीआड केले. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरविल्याने दुबार पेरणीचे अरिष्ट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.दोन दोन किलोमीटरवर पावसाने लपवाछपवीचा खेळ खेळल्याने काही शेतकऱ्यांचे बियाणे उतरले तर काहींचे उतरलेच नाही. पश्चिम भागात अजूनही शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नसल्याने बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून तीन लाखापर्यंत अल्प मुदत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदर असणार आहे. मात्र दोन लाखाच्या वरील कर्ज असलेल्या व दरवर्षी वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारापर्यंतच्या सानुग्रह अनुदानापासून शेतकरी वंचितच आहे.शासनाच्या प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार व दोन लाखाच्या वरील रक्कम भरल्यानंतर मिळणाऱ्या दोन लाख रकमेपासून शेतकरी अद्यापही वंचित आहे. शासनाने लवकरात लवकर दोन लाखाच्यावरील रक्कमेवरील कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.- मच्छिंद्र ठोंबरे, शेतकरी, पुरणगाव.येवला तालुक्‍यात उत्तर पूर्व भागातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पीक.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती