शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

डॉक्टर व रुग्ण यांच्यात संवादाची गरज : आव्हाड

By admin | Updated: June 1, 2014 00:45 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षान्त सोहळा : ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदान

आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षान्त सोहळा : ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदाननाशिक : जन्म आणि मृत्यूची बातमी सर्वप्रथम डॉक्टरच देतात़ डॉक्टरांप्रती रुग्णांच्या असलेल्या विश्वासामुळेच फॅ मिली डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात आली़ मात्र ही संकल्पना आता कुठेतरी लोप पावत चालली आहे़ डॉक्टरांच्या हातात विश्वासाने हात देणारे रुग्ण कमी झाले असून, या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे़ हा दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केले़ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ४७ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तर ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदान केल्याचे जाहीर करण्यात आले़ मुंबईच्या जी़एस़ मेडिकल कॉलेजच्या शेफ ाली पारीख या विद्यार्थिनीने १२ सुवर्ण पदके आणि एक रोख पारितोषिक मिळविले़ आव्हाड पुढे म्हणाले की, स्वप्न बघणे हा मानवी सिद्धांताचा एक भाग असून ते प्रत्येकाने बघितले पाहिजे़ मुलांनी केलेल्या स्वप्नपूर्तीचा आनंद आई-वडिलांच्या चेहर्‍यावर यावेळी स्पष्टपणे बघायला मिळतोय़ शिक्षण, विद्यार्थी व पालक शिक्षणाची त्रिसूत्री असून वैद्यकीय शिक्षणाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे़ मलेरिया, टॉयफ ाईड यापेक्षाही डायबिटीसने मृत्यू पावणार्‍याची संख्या जास्त असून, यासाठी काही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करणे, वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी, शिक्षक यांच्यावरील ताण-तणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कोर्सेस यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या तरच ते चांगले डॉक्टर होतील. यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे़ तसेच ज्या विद्यार्थ्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे त्यांनी भावी काळात आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण दुसर्‍याच्या डोळ्यात अश्रू तर आणत नाही ना याची जाणीव ठेवण्याची गरज असल्याचेही आव्हाड म्हणाले़ भारत सरकारच्या आरोग्य व कुटंुब कल्याण मंत्रालयाचे सचिव डॉ़ विश्व मोहन कटोच यांनी हेल्थ सायन्स हे बदलाचे सशक्त माध्यम असल्याचे सांगितले़ तसेच संशोधन ही एक निरंतन वैचारिक प्रक्रिया असून, जीवनात पुढे जाण्यासाठी स्वार्थीपणाचा अवलंब न करता सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा़ एकजूट आणि प्राचीन सभ्यता यामुळे भविष्यात देश नक्कीच पुढे जाईल, असेही कटोच यांनी सांगितले़