शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर व रुग्ण यांच्यात संवादाची गरज : आव्हाड

By admin | Updated: June 1, 2014 00:45 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षान्त सोहळा : ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदान

आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षान्त सोहळा : ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदाननाशिक : जन्म आणि मृत्यूची बातमी सर्वप्रथम डॉक्टरच देतात़ डॉक्टरांप्रती रुग्णांच्या असलेल्या विश्वासामुळेच फॅ मिली डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात आली़ मात्र ही संकल्पना आता कुठेतरी लोप पावत चालली आहे़ डॉक्टरांच्या हातात विश्वासाने हात देणारे रुग्ण कमी झाले असून, या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे़ हा दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केले़ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ४७ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तर ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदान केल्याचे जाहीर करण्यात आले़ मुंबईच्या जी़एस़ मेडिकल कॉलेजच्या शेफ ाली पारीख या विद्यार्थिनीने १२ सुवर्ण पदके आणि एक रोख पारितोषिक मिळविले़ आव्हाड पुढे म्हणाले की, स्वप्न बघणे हा मानवी सिद्धांताचा एक भाग असून ते प्रत्येकाने बघितले पाहिजे़ मुलांनी केलेल्या स्वप्नपूर्तीचा आनंद आई-वडिलांच्या चेहर्‍यावर यावेळी स्पष्टपणे बघायला मिळतोय़ शिक्षण, विद्यार्थी व पालक शिक्षणाची त्रिसूत्री असून वैद्यकीय शिक्षणाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे़ मलेरिया, टॉयफ ाईड यापेक्षाही डायबिटीसने मृत्यू पावणार्‍याची संख्या जास्त असून, यासाठी काही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करणे, वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी, शिक्षक यांच्यावरील ताण-तणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कोर्सेस यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या तरच ते चांगले डॉक्टर होतील. यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे़ तसेच ज्या विद्यार्थ्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे त्यांनी भावी काळात आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण दुसर्‍याच्या डोळ्यात अश्रू तर आणत नाही ना याची जाणीव ठेवण्याची गरज असल्याचेही आव्हाड म्हणाले़ भारत सरकारच्या आरोग्य व कुटंुब कल्याण मंत्रालयाचे सचिव डॉ़ विश्व मोहन कटोच यांनी हेल्थ सायन्स हे बदलाचे सशक्त माध्यम असल्याचे सांगितले़ तसेच संशोधन ही एक निरंतन वैचारिक प्रक्रिया असून, जीवनात पुढे जाण्यासाठी स्वार्थीपणाचा अवलंब न करता सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा़ एकजूट आणि प्राचीन सभ्यता यामुळे भविष्यात देश नक्कीच पुढे जाईल, असेही कटोच यांनी सांगितले़