शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

डॉक्टर व रुग्ण यांच्यात संवादाची गरज : आव्हाड

By admin | Updated: June 1, 2014 00:45 IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षान्त सोहळा : ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदान

आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षान्त सोहळा : ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदाननाशिक : जन्म आणि मृत्यूची बातमी सर्वप्रथम डॉक्टरच देतात़ डॉक्टरांप्रती रुग्णांच्या असलेल्या विश्वासामुळेच फॅ मिली डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात आली़ मात्र ही संकल्पना आता कुठेतरी लोप पावत चालली आहे़ डॉक्टरांच्या हातात विश्वासाने हात देणारे रुग्ण कमी झाले असून, या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे़ हा दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केले़ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ४७ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तर ६७१० विद्यार्थ्यांना पदवीदान केल्याचे जाहीर करण्यात आले़ मुंबईच्या जी़एस़ मेडिकल कॉलेजच्या शेफ ाली पारीख या विद्यार्थिनीने १२ सुवर्ण पदके आणि एक रोख पारितोषिक मिळविले़ आव्हाड पुढे म्हणाले की, स्वप्न बघणे हा मानवी सिद्धांताचा एक भाग असून ते प्रत्येकाने बघितले पाहिजे़ मुलांनी केलेल्या स्वप्नपूर्तीचा आनंद आई-वडिलांच्या चेहर्‍यावर यावेळी स्पष्टपणे बघायला मिळतोय़ शिक्षण, विद्यार्थी व पालक शिक्षणाची त्रिसूत्री असून वैद्यकीय शिक्षणाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे़ मलेरिया, टॉयफ ाईड यापेक्षाही डायबिटीसने मृत्यू पावणार्‍याची संख्या जास्त असून, यासाठी काही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करणे, वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी, शिक्षक यांच्यावरील ताण-तणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कोर्सेस यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या तरच ते चांगले डॉक्टर होतील. यासाठी रिक्त पदे भरण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे़ तसेच ज्या विद्यार्थ्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे त्यांनी भावी काळात आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण दुसर्‍याच्या डोळ्यात अश्रू तर आणत नाही ना याची जाणीव ठेवण्याची गरज असल्याचेही आव्हाड म्हणाले़ भारत सरकारच्या आरोग्य व कुटंुब कल्याण मंत्रालयाचे सचिव डॉ़ विश्व मोहन कटोच यांनी हेल्थ सायन्स हे बदलाचे सशक्त माध्यम असल्याचे सांगितले़ तसेच संशोधन ही एक निरंतन वैचारिक प्रक्रिया असून, जीवनात पुढे जाण्यासाठी स्वार्थीपणाचा अवलंब न करता सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा़ एकजूट आणि प्राचीन सभ्यता यामुळे भविष्यात देश नक्कीच पुढे जाईल, असेही कटोच यांनी सांगितले़