शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या ग्रामीण भागात मास्क वापराकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:37 IST

सिन्नर : देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे संकट जिल्ह्यात दिवसागणिक गडद होत चालले आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७००च्या आसपास असून, आत्तापर्यंत ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सिन्नर : देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे संकट जिल्ह्यात दिवसागणिक गडद होत चालले आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७००च्या आसपास असून, आत्तापर्यंत ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक बाधित सिन्नर तालुक्यात असूनही नागरिकांकडून गांभीर्य पाळले जात नसून मास्क वापराला कोलदांडा दाखवला जात आहे. तसेच सोशल ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चाही फज्जा उडाल्याचे चित्र आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टसिंग पाळणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वत:सह कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पाळणे करणे अपेक्षित आहे. मात्र शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे.सिन्नर तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही नागरिक बेफिकीर राहत असून, तोंडाला मास्क न लावता बिनधास्त वावरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. या निष्काळजी लोकांवर दंडात्मक कारवाई करूनही फारसा उपयोग होत नसल्याने नागरिकांची कोरोनाविषयीची भीती दूर झाली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे.सिन्नर तालुक्यात एप्रिल महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून होता होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने सक्तीची पावले उचलत लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली होती. टप्प्याटप्याने त्यात शिथिलता देत १ सप्टेंबरपासून सर्वच प्रकारची दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरामधील बाजारपेठ, बॅँका, शासकीय कार्यालये, बाजार समिती यांच्यासह विविध दुकानांत गर्दी दिसून येत आहे.या सार्वजनिक स्थळांवर वावरणाºया नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचाही समावेश असू शकतो. त्यांच्या माध्यमातून निरोगी व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी किमान तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे तसेच सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांकडून या दोन्ही नियमांचे पालन कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत सर्वेक्षण केल्यानंतर केवळ २० ते ३० टक्के लोकच मास्क किंवा रूमाल बांधलेले दिसून येतात. त्यामुळे कोरोनाचे संकट आटोक्यात येण्याऐवजी त्याचा पसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक