शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात द्राक्ष पंढरीची उपेक्षा; ऑनियन क्लस्टरही विस्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने तारल्याचे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षणात नोंदविले गेले. त्यामुळे या वर्षाच्या अर्थसंकल्पात शेती ...

नाशिक : कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने तारल्याचे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षणात नोंदविले गेले. त्यामुळे या वर्षाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी भरघोस तरतूद होण्याची अपेक्षा होती . परंतु, ही आशा नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी क्षणभंगूरच ठरली. अर्थसंकल्पात नाशिकच्या द्राक्ष, कांदा, डाळींब यासारख्या पिकांच्या अनुषंघाने कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा झाली असून शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

नाशिकमधील द्राक्ष, कांदा व डाळींब यासारख्या कृषी उत्पादानांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान मजबूत करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निर्यात केंद्र, कोल्ड स्टोरेज यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेच नाशिक जिल्ह्यात ऑनियन क्लस्टरची घोषणाही केली होती. त्यामुळे अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद जिल्ह्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित होती.मात्र ही योजनाही विस्मरणात गेल्याचे दिसून येत असून यासंदर्भातही कोणतीही तरतूद झालेली नाही. मात्र, यावर्षीच्या अर्थसंकल्पात परंपरागत सूक्ष्म सिंचनासाठी निधी वाढविणे, पतपुरवठ्याचा निधी वाढविणे, आधुनिक पायाभूत सुविधांसाठी निधी वाढविणे, अशा ठरावीक तरतुदी करतानाच कृषी विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर देणे, जागतिक बाजारात भारतीय शेतमालाचे स्थान उंचावणे, शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रत्यक्षात काहीच तरतूद झालेली नाही.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची कोट्यवधींची फसवणुकीचे प्रकार घडत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि अशा घटनेत शेतकऱ्यास नुकसानभरपाईच्या दृष्टीने अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. शेतमाल बाजारात येण्यापूर्वी साठवणुकीच्या, वाहतुकीच्या, प्रक्रियेच्या आणि निर्यातीच्या नव्या व्यवस्था निर्माण होण्यासाठी भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता होती. त्या दिशेनेही काहीही झालेले दिसत नाही. - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर केंद्र सरकार निर्यातबंदी करून दरवर्षी देशातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करते. त्यामुळे कांद्याला उत्पादनखर्चापेक्षा कमी दर मिळाल्यानंतर कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासाठी विशेष तरतूद करण्याची गरज होती. सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना कांदा निर्यात करण्यासाठी मुंबईसह, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे येथे थेट कांदा निर्यात केंद्र उभारणी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करणे गरजेचे होते; परंतु अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांना दुर्लक्षितच केले आहे.

-भारत दिघोळे, अध्यक्ष, -राज्य कांदा उत्पादक संघटना.