शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोना चाचण्यांच्या निगेटिव्ह प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:13 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये रुग्ण बाधित असण्याचे अर्थात अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. म्हणजेच एकूण कोरोना चाचण्यांमध्ये रुग्णचा अहवाल निगेटिव येण्याच्या प्रमाणात झालेली वाढ काहीशी दिलासादायक आहे.

ठळक मुद्दे2 लाख 81 हजारहून अधिक चाचण्यांमधून 2 लाख 49 नागरिक निगेटिव्ह आले

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये रुग्ण बाधित असण्याचे अर्थात अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. म्हणजेच एकूण कोरोना चाचण्यांमध्ये रुग्णचा अहवाल निगेटिव येण्याच्या प्रमाणात झालेली वाढ काहीशी दिलासादायक आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 2 लाख 81 हजारहून अधिक चाचण्यांमधून 2 लाख 49 नागरिक निगेटिव्ह आले असल्यामुळे एकुणातच अहवाल निगेटिव्ह येण्याची संख्या गत महिनाभरात वाढली आहे. ज्यांना थोडीफार देखील तापाची कणकण किंवा सर्दी-खोकला होतो, असे नागरिक स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घेत असल्याने त्यातील बहुतांश जण हे नियमित ताप किंवा सर्दी खोकल्याचे रुग्ण असल्याचे आढळते. त्यामुळे त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कोरोनाची बाधा असल्याचे आढळून येत नाही. त्यामुळेच हे निगेटिव्ह चाचण्यांचे प्रमाण वाढते असल्याचे निदशर्नास येत आहे. वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार आणि लक्षणे दिसत असल्याने नागरिकांच्या मनात शंका येणे सहाजिक आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे तपासणी करण्याचे प्रमाण काहीअंशी वाढले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने अत्यंत खात्रीशीर असणा?्या आरटीपीसीआर टेस्टच्या प्रमाणात देखील वाढ करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घरोघरी जाऊन जनजागृती आणि चाचण्यांच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे वेळीच बाधितांचा शोध घेणे देखील शक्य झाले असून त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. सहा महिन्यांपासून सर्व आरोग्य यंत्रणा आणि कमर्चारी अथकपणे करणाच्या विरोधातील लढाई लढत असलेले तरीदेखील रुग्ण आढळण्याचे प्रमाण फारशी घट आलेली नाही. त्यामुळे अजून काही काळ तरी ही लढाई सुरूच राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 69 हजार 171 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ हजार 508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 1437 झाली असून नवीन दाखल होणा?्या रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने दीड हजार च्या वरच राहिले आहे . आरटीपीसीआर चाचणी आणि त्यांच्या अहवालाला वेग देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. तरी अद्यापही हा आकडा 1000 पेक्षा अधिक असून हा आकडा देखील कमी होण्याची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल