शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओेझरखेडचे आवर्तन सोडण्याची निफाड, चांदवडकरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:26 IST

लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.

ठळक मुद्देशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल.

लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.ओझरखेड कालव्याअंतर्गत येणाºया गावांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरात शेतकरीवर्गापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात आजही भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ओझरखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये ७०हून अधिक पाणीवाटप सहकारी संस्था आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांनी या कालव्याच्या भरोशावर द्राक्षबागेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले असून, आपल्या द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत.ओझरखेड कालव्यातून चांदवड तालुक्यासाठी ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता ओझरखेड धरणातून जायकवाडीत पाणीपुरवठा केल्यास या भागात भीषण पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठीचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. यावेळी शरद काळे, माधवराव ढोमसे, रावसाहेब रायते, मोतीराम रायते, विठ्ठल कहाने, सारोळे, सरपंच कैलास भोसले, वनसगाव सरपंच उमेश डुंबरे, योगेश रायते, रामनाथ शिंदे, नंदू काळे, शंकर शिंदे, दत्ता मापारी, नंदू खुर्द, दादासाहेब खराटे तसेच विविध गावांतील पाणीवापर संस्थांचे चेअरमन उपस्थित होते.सटाणा, देवळा शहरासाठी पहिले आवर्तन १० नोव्हेंबरलासटाणा : शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या१० नोव्हेंबरपर्यंत चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीपात्रात पहिले आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्प व कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात सोडले जाणारे पाण्याचे आवर्तन जिल्हा प्रशासनाने थांबविले आहे. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा व आरम नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.सध्या शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करावी लागत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरु वातीलाच दिवाळीचा सण येत असून नागरिकांना या सणासाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे १० नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबरला पाण्याचे आवर्तन सोडावे, या आग्रही मागणीसाठी आमदार डॉ. राहुल अहेर, सटाणा पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता उन्हाळ्यात सटाणा शहरासाठी शंभर दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी चणकापूर धरणातून आवर्तनाने सोडणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी या भेटीत सांगितले. यावेळी महाराणा प्रताप क्र ांतिदलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, हेमंत भदाणे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.निफाड आणि येवला तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे ओझरखेड कालव्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यास आमचा विरोध आहे. शासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल.- शिवा सुरासे, पंचायत समिती सदस्य.