शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तंत्रज्ञान नव्हे तत्त्वज्ञानाची जगाला गरज : अनिल बोकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:36 IST

तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.

नाशिक : तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.दीपक करंजीकर लिखित ‘घातसूत्र’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोकील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदावरी हॉल येथे आयोजित या समारंभप्रसंगी ग्रंथाली प्रकाशनचे संस्थापक दिनकर गांगल उपस्थित होते. यावेळी बोकील म्हणाले. जग युद्धाच्या उंबरठ्यावर असताना करंजीकर यांनी पुस्तकातून नोंदविलेले निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. युद्धामागील तत्त्वज्ञान आणि सूत्रांची मिमांसा त्यांनी पुस्तकातून मांडली आहेत.यावेळी लेखक करंजीकर यांनी पुस्तक लिखानामागील आपली भूमिका मांडली. कळसूत्रीच्या बाहुल्यांची दोरी इतरांच्या हाती आहे त्याचा वेध ‘घातसूत्र’ पुस्तकातून घेण्यात आला आहे. हे पुस्तक लिहिताना ४८१ पुस्तकांचे वाचन आणि सात वर्षे सतत अभ्यास केल्यानंतर आंतरराष्टÑीय घडामोडीचे बारकावे सप्रमाण मांडले आहे.कम्युनिझम, सोशालिझम आणि कॅपिटललायझेशन या त्रिसूत्रीवरच युद्धाचे बिझनेस प्लॅन असतात. त्याची किंमत असेक जीव गमावून चुकवावी लागते हेच वास्तव असल्याचे करंजीकर म्हणाले.पुस्तकाचे अभिवाचन संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री विद्या करंजीकर, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, एटीएसचे डीआयजी दत्तात्रय कराळे यांनी केले.सायबर कम्युनिटीमुळे युद्धाचा धोका वाढलावाढत्या तंत्रज्ञान, सायबर इन्फरमेटिव्ह कम्युनिटीमुळे युद्धाचा धोकाच अधिक वाढला आहे. त्यावेळची कटकारस्थाने आता तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा भाग झाल्यामुळे जगापुढे असुरक्षिततेचा मोठा धोका उभा राहिला आहे. तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान यात फरक करता आला पाहिजे. अनुभवातून शिकलेली जुनी पिढी संपन्न असताना आजच्या तरुणांना सर्व तयार माहिती मिळते आणि त्यात अनुभवाचे शहाणपण नसते. अनुभव आणि प्रतिभा एकत्र आले तरच शहाणपण निर्माण होईल आणि तेच जगाला वाचवू शकेल, असे बोकील म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक