शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

तंत्रज्ञान नव्हे तत्त्वज्ञानाची जगाला गरज : अनिल बोकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:36 IST

तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.

नाशिक : तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.दीपक करंजीकर लिखित ‘घातसूत्र’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोकील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदावरी हॉल येथे आयोजित या समारंभप्रसंगी ग्रंथाली प्रकाशनचे संस्थापक दिनकर गांगल उपस्थित होते. यावेळी बोकील म्हणाले. जग युद्धाच्या उंबरठ्यावर असताना करंजीकर यांनी पुस्तकातून नोंदविलेले निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. युद्धामागील तत्त्वज्ञान आणि सूत्रांची मिमांसा त्यांनी पुस्तकातून मांडली आहेत.यावेळी लेखक करंजीकर यांनी पुस्तक लिखानामागील आपली भूमिका मांडली. कळसूत्रीच्या बाहुल्यांची दोरी इतरांच्या हाती आहे त्याचा वेध ‘घातसूत्र’ पुस्तकातून घेण्यात आला आहे. हे पुस्तक लिहिताना ४८१ पुस्तकांचे वाचन आणि सात वर्षे सतत अभ्यास केल्यानंतर आंतरराष्टÑीय घडामोडीचे बारकावे सप्रमाण मांडले आहे.कम्युनिझम, सोशालिझम आणि कॅपिटललायझेशन या त्रिसूत्रीवरच युद्धाचे बिझनेस प्लॅन असतात. त्याची किंमत असेक जीव गमावून चुकवावी लागते हेच वास्तव असल्याचे करंजीकर म्हणाले.पुस्तकाचे अभिवाचन संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री विद्या करंजीकर, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, एटीएसचे डीआयजी दत्तात्रय कराळे यांनी केले.सायबर कम्युनिटीमुळे युद्धाचा धोका वाढलावाढत्या तंत्रज्ञान, सायबर इन्फरमेटिव्ह कम्युनिटीमुळे युद्धाचा धोकाच अधिक वाढला आहे. त्यावेळची कटकारस्थाने आता तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा भाग झाल्यामुळे जगापुढे असुरक्षिततेचा मोठा धोका उभा राहिला आहे. तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान यात फरक करता आला पाहिजे. अनुभवातून शिकलेली जुनी पिढी संपन्न असताना आजच्या तरुणांना सर्व तयार माहिती मिळते आणि त्यात अनुभवाचे शहाणपण नसते. अनुभव आणि प्रतिभा एकत्र आले तरच शहाणपण निर्माण होईल आणि तेच जगाला वाचवू शकेल, असे बोकील म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक