शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काटकसरीने पाणी वापरण्याची गरज

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

काटकसरीने पाणी वापरण्याची गरज

 संजीव धामणे नांदगावजागतिक जलसंपत्ती दिनाचे औचित्य साधून पाणी संवर्धनाचे व संरक्षणाचे महत्त्व विविध पातळ्यांवरून कानीकपाळी ओरडून सांगितले जाणार आहे. केवळ दिन साजरा करण्यापुरते ते असू नये. तो एक संस्कार व्हावा या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई लक्षात घेता प्रत्येकानेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याची गरज आहे.पाण्याचा पिण्यापासून तर शेती, औद्योगिक विविध कारणांसाठी उपयोग आहे. मान्सूनचे अवेळी येणे व पुरेसा पाऊस नसणे यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. गावोगावीचे जलस्त्रोत कोरडे पडल्याने, गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या जलाशयांमधून पाणी आणावे लागत आहे. अवर्षणप्रवण नांदगाव तालुका हे त्याचे मासलेवाईक उदाहरण ठरावे. येथील नद्यांचे स्त्रोत कमी होत चालल्याने शेती व्यवसाय घायकुतीस आला आहे. नव्याने स्थायिक होणारे नांदगाव व मनमाड शहरांचा विचार सोडून इतरत्र स्थलांतरित होऊ लागले आहेत.नांदगाव शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी गळतीमुळे वाया जाते असा अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे होणारे दिन आजकाल शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ देऊन साजरे होत असतात. मात्र घरोघरी हा संदेश पोहोचण्यासाठी अजून काही काळ जावा लागणार आहे.शीतावरून भाताची परीक्षा हे तत्त्व मान्य केले तर नांदगावसारख्या ठिकाणी पाण्याची मागणी व पुरवठा यात मोठी दरी आहे. ती दरी केवळ नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने आहे असे नाही तर अकार्यक्षम प्रशासन, दूरदृष्टीचा अभाव असलेले लोकप्रतिनिधी यांच्यामुळेसुद्धा आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. चुकीच्या व्यवस्थेमध्ये हजारो व लाखो लिटर पाणी वाया जाते. अभियांत्रिकी अपयशामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. अलीकडची माणिकपुंज योजना हे अभियांत्रिकीचे मोठे अपयश असल्याचे मानले जाते.जागतिक जलसंपत्ती दिनानिमित्त वाया जाणाऱ्या पाण्याचा स्रोत थांबविण्याची गरज आहे. गुरुकृपा- नगरासारख्या गळत्या व कमकुवत, तकलादू व्यवस्था बदलण्याची शपथ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतली तरी खऱ्या अर्थाने जलसंपत्ती दिन साजरा केल्यासारखा होईल.