शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

काटकसरीने पाणी वापरण्याची गरज

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

काटकसरीने पाणी वापरण्याची गरज

 संजीव धामणे नांदगावजागतिक जलसंपत्ती दिनाचे औचित्य साधून पाणी संवर्धनाचे व संरक्षणाचे महत्त्व विविध पातळ्यांवरून कानीकपाळी ओरडून सांगितले जाणार आहे. केवळ दिन साजरा करण्यापुरते ते असू नये. तो एक संस्कार व्हावा या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई लक्षात घेता प्रत्येकानेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याची गरज आहे.पाण्याचा पिण्यापासून तर शेती, औद्योगिक विविध कारणांसाठी उपयोग आहे. मान्सूनचे अवेळी येणे व पुरेसा पाऊस नसणे यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. गावोगावीचे जलस्त्रोत कोरडे पडल्याने, गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या जलाशयांमधून पाणी आणावे लागत आहे. अवर्षणप्रवण नांदगाव तालुका हे त्याचे मासलेवाईक उदाहरण ठरावे. येथील नद्यांचे स्त्रोत कमी होत चालल्याने शेती व्यवसाय घायकुतीस आला आहे. नव्याने स्थायिक होणारे नांदगाव व मनमाड शहरांचा विचार सोडून इतरत्र स्थलांतरित होऊ लागले आहेत.नांदगाव शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी गळतीमुळे वाया जाते असा अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे होणारे दिन आजकाल शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ देऊन साजरे होत असतात. मात्र घरोघरी हा संदेश पोहोचण्यासाठी अजून काही काळ जावा लागणार आहे.शीतावरून भाताची परीक्षा हे तत्त्व मान्य केले तर नांदगावसारख्या ठिकाणी पाण्याची मागणी व पुरवठा यात मोठी दरी आहे. ती दरी केवळ नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने आहे असे नाही तर अकार्यक्षम प्रशासन, दूरदृष्टीचा अभाव असलेले लोकप्रतिनिधी यांच्यामुळेसुद्धा आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. चुकीच्या व्यवस्थेमध्ये हजारो व लाखो लिटर पाणी वाया जाते. अभियांत्रिकी अपयशामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. अलीकडची माणिकपुंज योजना हे अभियांत्रिकीचे मोठे अपयश असल्याचे मानले जाते.जागतिक जलसंपत्ती दिनानिमित्त वाया जाणाऱ्या पाण्याचा स्रोत थांबविण्याची गरज आहे. गुरुकृपा- नगरासारख्या गळत्या व कमकुवत, तकलादू व्यवस्था बदलण्याची शपथ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतली तरी खऱ्या अर्थाने जलसंपत्ती दिन साजरा केल्यासारखा होईल.