शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

काटकसरीने पाणी वापरण्याची गरज

By admin | Updated: April 23, 2016 23:57 IST

काटकसरीने पाणी वापरण्याची गरज

 संजीव धामणे नांदगावजागतिक जलसंपत्ती दिनाचे औचित्य साधून पाणी संवर्धनाचे व संरक्षणाचे महत्त्व विविध पातळ्यांवरून कानीकपाळी ओरडून सांगितले जाणार आहे. केवळ दिन साजरा करण्यापुरते ते असू नये. तो एक संस्कार व्हावा या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाणीटंचाई लक्षात घेता प्रत्येकानेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याची गरज आहे.पाण्याचा पिण्यापासून तर शेती, औद्योगिक विविध कारणांसाठी उपयोग आहे. मान्सूनचे अवेळी येणे व पुरेसा पाऊस नसणे यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. गावोगावीचे जलस्त्रोत कोरडे पडल्याने, गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या जलाशयांमधून पाणी आणावे लागत आहे. अवर्षणप्रवण नांदगाव तालुका हे त्याचे मासलेवाईक उदाहरण ठरावे. येथील नद्यांचे स्त्रोत कमी होत चालल्याने शेती व्यवसाय घायकुतीस आला आहे. नव्याने स्थायिक होणारे नांदगाव व मनमाड शहरांचा विचार सोडून इतरत्र स्थलांतरित होऊ लागले आहेत.नांदगाव शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी गळतीमुळे वाया जाते असा अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे होणारे दिन आजकाल शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ देऊन साजरे होत असतात. मात्र घरोघरी हा संदेश पोहोचण्यासाठी अजून काही काळ जावा लागणार आहे.शीतावरून भाताची परीक्षा हे तत्त्व मान्य केले तर नांदगावसारख्या ठिकाणी पाण्याची मागणी व पुरवठा यात मोठी दरी आहे. ती दरी केवळ नागरिकांमध्ये जागरूकता नसल्याने आहे असे नाही तर अकार्यक्षम प्रशासन, दूरदृष्टीचा अभाव असलेले लोकप्रतिनिधी यांच्यामुळेसुद्धा आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. चुकीच्या व्यवस्थेमध्ये हजारो व लाखो लिटर पाणी वाया जाते. अभियांत्रिकी अपयशामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. अलीकडची माणिकपुंज योजना हे अभियांत्रिकीचे मोठे अपयश असल्याचे मानले जाते.जागतिक जलसंपत्ती दिनानिमित्त वाया जाणाऱ्या पाण्याचा स्रोत थांबविण्याची गरज आहे. गुरुकृपा- नगरासारख्या गळत्या व कमकुवत, तकलादू व्यवस्था बदलण्याची शपथ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतली तरी खऱ्या अर्थाने जलसंपत्ती दिन साजरा केल्यासारखा होईल.