शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शिवरायांचे चारित्र्य समजून घेण्याची गरज : संदीप जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:45 IST

महाराष्ट्राच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हजारो पटींनी अधिक आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तरी या भूमीत शेतकरी आत्महत्या का करतो? महिलांवर अत्याचार का होतात? हे प्रश्न चिंताग्रस्त करतात.

नाशिक : महाराष्ट्राच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हजारो पटींनी अधिक आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तरी या भूमीत शेतकरी आत्महत्या का करतो? महिलांवर अत्याचार का होतात? हे प्रश्न चिंताग्रस्त करतात. महाराष्टला छत्रपती शिवरायांचे चरित्र माहीत आहे, मात्र त्यांचे चारित्र्य अद्यापही समजून घेण्याचा प्रयत्न समाजात झालेला दिसून येत नाही, अशी खंत प्रा. संदीप जगताप यांनी व्यक्त केली.गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २२वे पुष्प जगताप यांनी ‘शिवशाही ते लोकशाही’ या विषयावर बुधवारी (दि.२२) गुंफले. यावेळी ते म्हणाले, देशाच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक अवस्था पुनर्जिवीत करण्याची खरी गरज आहे. त्याशिवाय भारतात परिवर्तन घडणे अशक्यप्राय बाब आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवराय, शहीद भगतसिंग यांच्या वाट्याला किती आयुष्य आले आणि त्यांनी ते कसे जगले, याचा आपण कधी विचार केला नाही किंवा तशी गरजही वाटली नाही, म्हणूनच आज समाजात मागासलेपण वैचारिक दारिद्र्य पहावयास मिळत आहे, हे दुर्दैवाने सांगावे लागते. त्यांनी जसे आयुष्य जगले त्यामधून क्रांती घडविली आणि इतिहास लिहिला गेला, हे समाजाला विसरून चालणार नाही, असे जगताप यांनी यावेळी सांगितले. वैचारिक अवस्था, महामानवाच्या चरित्रातून चारित्र्य समजून घेतल्याशिवाय आपला देश, समाज पुढे जाऊ शकणार नाही. मनशुद्धी करण्याची गरज आहे. मनाची जागा मोठी करून संकुचित वृत्ती सोडावी लागेल. तरच लोकशाहीची वाटचाल शिवशाहीकडे होईल, असे जगताप म्हणाले.आजचे व्याख्यानवक्ते : मंगेश पंचाक्षरीविषय : तुमची रास तुमचा स्वभाव

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजcultureसांस्कृतिक