शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे चारित्र्य समजून घेण्याची गरज : संदीप जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:45 IST

महाराष्ट्राच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हजारो पटींनी अधिक आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तरी या भूमीत शेतकरी आत्महत्या का करतो? महिलांवर अत्याचार का होतात? हे प्रश्न चिंताग्रस्त करतात.

नाशिक : महाराष्ट्राच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हजारो पटींनी अधिक आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तरी या भूमीत शेतकरी आत्महत्या का करतो? महिलांवर अत्याचार का होतात? हे प्रश्न चिंताग्रस्त करतात. महाराष्टला छत्रपती शिवरायांचे चरित्र माहीत आहे, मात्र त्यांचे चारित्र्य अद्यापही समजून घेण्याचा प्रयत्न समाजात झालेला दिसून येत नाही, अशी खंत प्रा. संदीप जगताप यांनी व्यक्त केली.गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २२वे पुष्प जगताप यांनी ‘शिवशाही ते लोकशाही’ या विषयावर बुधवारी (दि.२२) गुंफले. यावेळी ते म्हणाले, देशाच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक अवस्था पुनर्जिवीत करण्याची खरी गरज आहे. त्याशिवाय भारतात परिवर्तन घडणे अशक्यप्राय बाब आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवराय, शहीद भगतसिंग यांच्या वाट्याला किती आयुष्य आले आणि त्यांनी ते कसे जगले, याचा आपण कधी विचार केला नाही किंवा तशी गरजही वाटली नाही, म्हणूनच आज समाजात मागासलेपण वैचारिक दारिद्र्य पहावयास मिळत आहे, हे दुर्दैवाने सांगावे लागते. त्यांनी जसे आयुष्य जगले त्यामधून क्रांती घडविली आणि इतिहास लिहिला गेला, हे समाजाला विसरून चालणार नाही, असे जगताप यांनी यावेळी सांगितले. वैचारिक अवस्था, महामानवाच्या चरित्रातून चारित्र्य समजून घेतल्याशिवाय आपला देश, समाज पुढे जाऊ शकणार नाही. मनशुद्धी करण्याची गरज आहे. मनाची जागा मोठी करून संकुचित वृत्ती सोडावी लागेल. तरच लोकशाहीची वाटचाल शिवशाहीकडे होईल, असे जगताप म्हणाले.आजचे व्याख्यानवक्ते : मंगेश पंचाक्षरीविषय : तुमची रास तुमचा स्वभाव

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजcultureसांस्कृतिक