शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

नद्याचे प्रदूषण दूर करण्याची आवश्यकता : शिंदे

By admin | Updated: February 23, 2017 00:02 IST

नद्याचे प्रदूषण दूर करण्याची आवश्यकता : शिंदे

देवळाली कॅम्प : देशाला खऱ्या अर्थाने सुजलाम् व सुफलाम् करण्यासाठी गो-संवर्धनासह गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा यांसारख्या नद्यांचे प्रदूषण दूर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वारकरी शिक्षण संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू हभप संदीपान महाराज शिंदे (हासेगावकर) यांनी केले.  लहवित येथील वाडीचा मळा येथील भैरवनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (आळंदी) शताब्दी महोत्सव व संगीत गाथा पारायण सोहळ्याच्या समारोपप्रसंगी हभप संदीपान महाराज शिंदे यांनी ‘गोड लागे परी सांगताची न ये, बैसे माझी अंगे हरपली’ या भगवान श्रीकृष्णाचे वर्णन करणाऱ्या गौळणीवर आधारित भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वर्णन व आजच्या समाजाला गरज असणाऱ्या तत्त्वचिंतनावर काल्याचे कीर्तन केले. यावेळी सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या चरण पादुकांची महामंडलेश्वर जगद्गुरू विठ्ठलनाथ द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, श्रीश्री महामंडलेश्वर दासजी, स्वामी कृष्णचैतन्य स्वामी, गणेशगिरी रामकृष्ण महाराज ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव, खासदार हेमंत गोडसे यांसह विविध साधू-महंत यांच्या उपस्थितीत शाहीस्नान घालण्यात आले. गाथा पारायण सप्ताहात नंदकिशोर महाराज वाघमारे, समाधान महाराज पाटील, मनोहर महाराज सायखेडे आदिंनी संगीत पारायण सांगितल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)