शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाच्या पुनर्मांडणीची गरज उत्पात : मोहिनीराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:19 IST

भारताचा इतिहास गौरवशाली आणि शूरवीरांचा आहे. मात्र, इंग्रजांनी या देशावर अंमल प्रस्थापित करताना दुहीची बीजे पेरत चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली, असा आरोप पंढरपूर येथील भागवताचार्य वासुदेव उत्पात यांनी केला.

ठळक मुद्देजीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कारगौरवशाली इतिहासाचे विवेचनतरुण पिढीपुढे खरा इतिहास आला पाहिजे

नाशिक : भारताचा इतिहास गौरवशाली आणि शूरवीरांचा आहे. मात्र, इंग्रजांनी या देशावर अंमल प्रस्थापित करताना दुहीची बीजे पेरत चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केली, असा आरोप पंढरपूर येथील भागवताचार्य वासुदेव उत्पात यांनी केला. नव्या पिढीला खरा इतिहास कळला पाहिजे त्यासाठी इतिहासाच्या पुनर्मांडणीची गरजही त्यांनी व्यक्त केली.श्री मोहिनीराज भक्त मंडळाच्या नाशिक शाखेच्या वतीने येथील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित जीवन गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा श्री मोहिनीराज जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. भारताच्या गौरवशाली इतिहासाचे विवेचन करताना उत्पात यांनी अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले, जगाला अभिमान वाटावा, असा भारताचा इतिहास आहे. इतिहासाची पुन्हा एकदा नव्याने मांडणी होणे गरजेच आहे. तरुण पिढीपुढे देशाचा खरा इतिहास आला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी भागवताचार्य उत्पात यांच्या हस्ते रामचंद्र धर्माधिकारी, दिगंबर कुलकर्णी, वासुदेव कुलकर्णी, दामोदर गर्गे, सुमन गायधनी, नारायण गायधनी, शकुंतला चंद्रात्रे, विद्या मोहोळे, पुष्पा देव, नलिनी झेंडे, वसंत गर्गे, निर्मला गायधनी, रामचंद्र जोशी, प्रभावती गायधनी, वसंत गायधनी आदींना शाल व स्मृतिचिन्ह देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष किशोर गायधनी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विश्वस्त यादवराव शुक्ल, महिला अध्यक्ष चित्रा देव, दत्तात्रय गायधनी, विनायकराव शुक्ल, विजय डोंगरे, रमेश देव, सुनीता गायधनी, सुवर्णा कुलकर्णी आदींसह श्री मोहिनीराज भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.सावरकरांचे स्मारक व्हावे..वारकरी पंढरपूरची वारी करतात, तशी मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाशिकची वारी करतो, असे सांगून उत्पात यांनी जाज्वल्य राष्टÑभक्त असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्टÑीय स्मारक झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.