शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सागरी सीमा सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न हवे : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:04 IST

भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही.

नाशिक : भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही. सागरी सुरक्षेसाठी नौदल, सागरी पोलीस दल, तटरक्षक दल, गुप्तहेर संस्था अशा सर्वच संरक्षण दलांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.  मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प महाजन यांनी ‘सागरी सुरक्षा : आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर गुंफले. यावेळी महाजन म्हणाले, भारत पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होत आहे, यात शंका नाही. भारताची बाह्य सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा या दोन्ही बाबींचा विचार केला तर भारत चीनच्या तुलनेत अंतर्गत सुरक्षेत मागे पडलेला आहे. त्याचाच फायदा पाकिस्तानकडून १९७१ नंतर उचलला जात आहे. अंतर्गत सुरक्षा पोखरलेली असल्यामुळे पाकिस्तानने नियंत्रण रेषेपलीकडून अपारंपरिक युद्ध दहशतवादी भारतात पाठवून सुरू केले आहे. हे युद्ध सामान्य माणसांवर लादलेले आहे. भारत शत्रूंच्या बाबतीत भाग्यवान म्हटला पाहिजे. आपल्या देशाला सर्व प्रकारचे शत्रू आहेत. भारताची सागरी सीमा ७ हजार ६०० किलोमीटर इतकी आहे. अंदमान निकोबार, लक्षद्वीप सागरी सीमेवर आहे. ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारताची सागरी सीमा पसरलेली आहे.परदेशी मासेमारी रोखाभारताने सागरी सुरक्षेचा विचार करता अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेटांच्या परिसरात भारतीय सागरी सीमेअंतर्गत घुसखोरी करुन श्रीलंका, थायलंड या देशांमधील लोक मासेमारी करतात. ही मासेमारी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. तसेच बांग्लादेशी घुसखोरीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यासाठी आतापासूनच भारताने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे महाजन यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक