शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

सागरी सीमा सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न हवे : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:04 IST

भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही.

नाशिक : भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही. सागरी सुरक्षेसाठी नौदल, सागरी पोलीस दल, तटरक्षक दल, गुप्तहेर संस्था अशा सर्वच संरक्षण दलांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.  मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प महाजन यांनी ‘सागरी सुरक्षा : आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर गुंफले. यावेळी महाजन म्हणाले, भारत पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होत आहे, यात शंका नाही. भारताची बाह्य सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा या दोन्ही बाबींचा विचार केला तर भारत चीनच्या तुलनेत अंतर्गत सुरक्षेत मागे पडलेला आहे. त्याचाच फायदा पाकिस्तानकडून १९७१ नंतर उचलला जात आहे. अंतर्गत सुरक्षा पोखरलेली असल्यामुळे पाकिस्तानने नियंत्रण रेषेपलीकडून अपारंपरिक युद्ध दहशतवादी भारतात पाठवून सुरू केले आहे. हे युद्ध सामान्य माणसांवर लादलेले आहे. भारत शत्रूंच्या बाबतीत भाग्यवान म्हटला पाहिजे. आपल्या देशाला सर्व प्रकारचे शत्रू आहेत. भारताची सागरी सीमा ७ हजार ६०० किलोमीटर इतकी आहे. अंदमान निकोबार, लक्षद्वीप सागरी सीमेवर आहे. ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारताची सागरी सीमा पसरलेली आहे.परदेशी मासेमारी रोखाभारताने सागरी सुरक्षेचा विचार करता अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेटांच्या परिसरात भारतीय सागरी सीमेअंतर्गत घुसखोरी करुन श्रीलंका, थायलंड या देशांमधील लोक मासेमारी करतात. ही मासेमारी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. तसेच बांग्लादेशी घुसखोरीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यासाठी आतापासूनच भारताने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे महाजन यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक