शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सागरी सीमा सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न हवे : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:04 IST

भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही.

नाशिक : भारताला तीनही बाजूंनी समुद्रकिनारे लाभलेले असल्यामुळे भारत नशीबवान आहे; मात्र अद्याप या समुद्रकिनाऱ्यांचा आपण कधीही चांगला उपयोग करुन घेतला नाही. सागरी सुरक्षेसाठी नौदल, सागरी पोलीस दल, तटरक्षक दल, गुप्तहेर संस्था अशा सर्वच संरक्षण दलांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.  मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प महाजन यांनी ‘सागरी सुरक्षा : आव्हाने व उपाययोजना’ या विषयावर गुंफले. यावेळी महाजन म्हणाले, भारत पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होत आहे, यात शंका नाही. भारताची बाह्य सुरक्षा व अंतर्गत सुरक्षा या दोन्ही बाबींचा विचार केला तर भारत चीनच्या तुलनेत अंतर्गत सुरक्षेत मागे पडलेला आहे. त्याचाच फायदा पाकिस्तानकडून १९७१ नंतर उचलला जात आहे. अंतर्गत सुरक्षा पोखरलेली असल्यामुळे पाकिस्तानने नियंत्रण रेषेपलीकडून अपारंपरिक युद्ध दहशतवादी भारतात पाठवून सुरू केले आहे. हे युद्ध सामान्य माणसांवर लादलेले आहे. भारत शत्रूंच्या बाबतीत भाग्यवान म्हटला पाहिजे. आपल्या देशाला सर्व प्रकारचे शत्रू आहेत. भारताची सागरी सीमा ७ हजार ६०० किलोमीटर इतकी आहे. अंदमान निकोबार, लक्षद्वीप सागरी सीमेवर आहे. ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारताची सागरी सीमा पसरलेली आहे.परदेशी मासेमारी रोखाभारताने सागरी सुरक्षेचा विचार करता अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेटांच्या परिसरात भारतीय सागरी सीमेअंतर्गत घुसखोरी करुन श्रीलंका, थायलंड या देशांमधील लोक मासेमारी करतात. ही मासेमारी नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. तसेच बांग्लादेशी घुसखोरीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यासाठी आतापासूनच भारताने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे महाजन यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक