शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:05 IST

दोन विद्यापीठे आणि आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळा तसेच महाविद्यालयांची संख्या मोठी असतानाही शासकीय स्तरावर मात्र नाशिकची उपेक्षा झाली आहे. उत्तर महाराष्टÑाची राजधानी मानल्या जाणाºया नाशिकमध्ये एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने मात्र तंत्रशिक्षण घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांचे दरवर्षी हाल वाढत आहेत. एकतर पुणे किंवा जळगाव असे पर्याय निवडावे लागत असल्याने आता स्थानिक स्तरावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी राज्यातील सरकार नाशिकला न्याय देणार काय, हा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.

साहेबराव अहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाथर्डी फाटा : दोन विद्यापीठे आणि आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळा तसेच महाविद्यालयांची संख्या मोठी असतानाही शासकीय स्तरावर मात्र नाशिकची उपेक्षा झाली आहे. उत्तर महाराष्टÑाची राजधानी मानल्या जाणाºया नाशिकमध्ये एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने मात्र तंत्रशिक्षण घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांचे दरवर्षी हाल वाढत आहेत. एकतर पुणे किंवा जळगाव असे पर्याय निवडावे लागत असल्याने आता स्थानिक स्तरावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी राज्यातील सरकार नाशिकला न्याय देणार काय, हा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.  सुवर्णत्रिकोणातील नाशिक हे उत्तर महाराष्टÑाचे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असले तरी शैक्षणिकदृष्ट्या मात्र शासनाकडून नाशिकला पुरेसा न्याय मिळाला नसल्याची भावना आहे. शासकीय महाविद्यालये मिळवण्यात नाशिकच्या तुलनेत धुळे आणि जळगाव या दुय्यम शहरांनी मात्र आजवर बाजी मारल्याचे दिसते. धुळे आणि जळगावला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणजेच शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालय १९६० मध्ये सुरू करण्यात आले. नाशिकला मात्र गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सुरू व्हायला १९८० साल उजडावे लागले. नाशिकला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू झाल्यानंतर १९८९ पासून विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे कार्यालय सुरू झाले. त्याअंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील २८ इंजिनिअरिंग पदवी, फॉर्मसी, मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक शिक्षणक्र मांचे प्रशासकीय नियंत्रण केले जाते. असे असूनही नाशिकला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय न देता युती शासनाच्या काळात ते १९९६ मध्ये जळगाव जिल्ह्यास देण्यात आले.  विभागाला एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जिल्ह्याला एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक व तालुक्याला एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असावे, असे साधारण सरकारचे धोरण असल्याचे विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभागीय सहसंचालक डॉ. ज्ञानदेव नाठे यांचे म्हणणे आहे. मग तंत्रशिक्षण विभागाचे पाच जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय नाशिकला आहे. तर अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिकला का नको, असा प्रश्न शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.  नाशिकला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांना बारावीनंतर व डिप्लोमानंतर गुणवत्ता सिद्ध करूनही एकतर पुणे येथील महाविद्यालयात प्रवेशासाठी तिथल्याही विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते किंवा जळगावचा पर्याय स्वीकारावा लागतो अथवा फी, डोनेशन भरून खासगी महाविद्यालयांमध्ये नाइलाजाने प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळेच नाशिकमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची गरज अधिक भासू लागली आहे. यासंदर्भात पश्चिम नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.