शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘शाळा बंद’च्या विरोधात लढ्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:07 IST

कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे मत सीटूच्या राष्टÑीय अध्यक्ष के. हेमलता यांनी व्यक्त केले.

सिडको : कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे मत सीटूच्या राष्टÑीय अध्यक्ष के. हेमलता यांनी व्यक्त केले.खुटवडनगर येथील सीटू भवनात आयोजित शिक्षणाचे व्यापारीकरण व बरोजगारीविरोधी महाराष्टÑ राज्य कामगार, विद्यार्थी व युवक परिषदेप्रसंगी के. हेमलता बोलत होत्या. व्यासपीठावर सीटूचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम, डीवायएफआयच्या राज्य सरचिणीस प्रिती शेखर, डीवायएफआयचे राज्य अध्यक्ष सुनील धनवा, एसएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सरचिटणीस बालाजी कडेलवाड, सीटूचे राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे आदी उपस्थित होते. हेमलता पुढे म्हणाल्या सरकारने महाकाय रेल्वे व्यवस्था मोडून देशी अणि विदेशी खासगी व्यावसायिकांच्या हाती देण्याचे ठरविले आहे. भाजपा सरकारने मागील गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थीविरोधी निर्णय घेण्यात आलेले आहेत.शिक्षण हक्क कायदा सोडला तर इतर सर्व शैक्षणिक धोरणं ही विद्यार्थीविरोधी व बाजारू व्यवस्थेला मोकळे रान करणारीच आहे. तसेच कामगार व मजुरांच्या विरोधात व मालकांच्या बाजूनेच कायदे करण्यात येत असल्याने यापुढील काळात देशाला बेरोजगारी व शिक्षणाचे खासगीकरण करणाºया सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचेही हेमलता म्हणाल्या.  माजी आमदार नरसय्या आडम यांनी देखील सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. गेल्या दि. ३ जानेवारी महाराष्टÑ बंद यशस्वी झाल्याने सरकार हतबल झाले होते. या देशात बेरोजगारी वाढतच असून, शेतकरी आत्महत्या करीत आहे.  भारतात २२ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असून, यापैकी उच्च शिक्षण घेणाºयांची संख्या अवघी ७० लाख इतकीच आहे. गरीब, आदिवासी व शेतकºयांच्या मुलांनी व ज्याला कसलाही आधार नाही त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, असे आडम यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक