शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

‘शाळा बंद’च्या विरोधात लढ्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:07 IST

कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे मत सीटूच्या राष्टÑीय अध्यक्ष के. हेमलता यांनी व्यक्त केले.

सिडको : कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे मत सीटूच्या राष्टÑीय अध्यक्ष के. हेमलता यांनी व्यक्त केले.खुटवडनगर येथील सीटू भवनात आयोजित शिक्षणाचे व्यापारीकरण व बरोजगारीविरोधी महाराष्टÑ राज्य कामगार, विद्यार्थी व युवक परिषदेप्रसंगी के. हेमलता बोलत होत्या. व्यासपीठावर सीटूचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम, डीवायएफआयच्या राज्य सरचिणीस प्रिती शेखर, डीवायएफआयचे राज्य अध्यक्ष सुनील धनवा, एसएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सरचिटणीस बालाजी कडेलवाड, सीटूचे राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे आदी उपस्थित होते. हेमलता पुढे म्हणाल्या सरकारने महाकाय रेल्वे व्यवस्था मोडून देशी अणि विदेशी खासगी व्यावसायिकांच्या हाती देण्याचे ठरविले आहे. भाजपा सरकारने मागील गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थीविरोधी निर्णय घेण्यात आलेले आहेत.शिक्षण हक्क कायदा सोडला तर इतर सर्व शैक्षणिक धोरणं ही विद्यार्थीविरोधी व बाजारू व्यवस्थेला मोकळे रान करणारीच आहे. तसेच कामगार व मजुरांच्या विरोधात व मालकांच्या बाजूनेच कायदे करण्यात येत असल्याने यापुढील काळात देशाला बेरोजगारी व शिक्षणाचे खासगीकरण करणाºया सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचेही हेमलता म्हणाल्या.  माजी आमदार नरसय्या आडम यांनी देखील सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगितले. गेल्या दि. ३ जानेवारी महाराष्टÑ बंद यशस्वी झाल्याने सरकार हतबल झाले होते. या देशात बेरोजगारी वाढतच असून, शेतकरी आत्महत्या करीत आहे.  भारतात २२ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत असून, यापैकी उच्च शिक्षण घेणाºयांची संख्या अवघी ७० लाख इतकीच आहे. गरीब, आदिवासी व शेतकºयांच्या मुलांनी व ज्याला कसलाही आधार नाही त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, असे आडम यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक