शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

स्वत:तील दोष नष्ट करण्याची गरज : वेणाभारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:18 IST

समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले.

नाशिक : समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘श्री समर्थ हृदयातील राम’ या विषयावर वेणाभारती महाराज यांचे प्रवचन झाले यावेळी त्या बोलत होत्या. समर्थ हृदयातील राम समजायला साधना हवी, तप हवे, गुरूसेवा घडायला हवी व गुरूकडून ज्ञान घ्यायला हवे. दशमी तिथीची सायंकाळ साधनेसाठी खूप महत्त्वाची आहे, पण आजच्या काळात समाजमाध्यमात रमणारे मन राम नामात लागेल का, अशी शंका व्यक्त करीत स्वत:मधील रावण शोधून म्हणजेच दोष शोधून ते मारायला हवेत, असे विचार मांडले. समर्थांसारखे समर्थ व्हायचे तर रामसेवा हा एकच ध्यास हवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, मंदिराचे विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी वेणाभारती महाराज यांचा सत्कार केला.वाचा कोमल हवीसमर्थांनी अवघड काळात दारोदारी जाऊन राम नाम जागरण केले, धाडसाने रामकार्य केले, म्हणून गुरू शोधा व त्यांना आपल्या जन्माचे कारण विचारा, असे सांगून त्यांनी हृदयात राम येण्यासाठी मन पूर्ण रिकामे हवे, शुद्ध हवे, कोमल वाचा हवी, स्वत:जवळ शांत बसायला हवे, असेही वेणाभारती महाराज म्हणाल्या.

टॅग्स :Nashikनाशिक