शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

ज्ञानासाठी कला हा सिद्धांत प्रस्थापित होण्याची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:03 IST

कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे,

नाशिक : कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.  निमित्त होते, मंगळवारी (दि.२५) परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित तिसऱ्या बोधिकला संगितीच्या उद्घाटनाचे. राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ व बोधी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोधिकला संगितीच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून देशमुख बोलत होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य-संस्कृती मंडळाचे सदस्य शशिकांत सावंत, अशोक हांडोरे, राज बाळदकर, भगवान हिरे उपस्थित होते.  हांडोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरेश मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान,‘मराठी साहित्यातील वैचारिकता’ या विषयावर परिसंवाद रंगला.  अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अनिल सपकाळ होते, तर देवेंद्र उबाळे, मुकुंद कुलकर्णी, डॉ. अलका शिंदे-पवार, हरीश इथापे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, चंद्रकांत महामिने, डॉ. बी. जी. वाघ, कवी किशोर पाठक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.रंगले काव्यकार संमेलन व कथाकथन सत्रमनाला भिडणाºया कथा व समाज आणि व्यवस्थेबाबतच्या सत्य परिस्थितीचे चित्रण करणाºया कवितांनी वास्तववादाचे चित्रण करत बोधी कला संगितीच्या दुसºया सत्रात बुधवारी (दि. २६) औरंगाबादकर सभागृहात कपूर वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली काव्यकार संमेलन रंगले. थेट मानवी वृत्तीचे दर्शन घडणाºया साहित्यकृतींनी प्रेक्षकांना अंर्तमुख केले. सोबतच समानतेसाठी विद्रोही भूमिकाही ताकदीने मांडण्यात काव्यकार यशस्वी ठरले. कथाकथनाचा कार्यक्र म ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरु वातीला लेखक नंदिकशोर साळवे यांनी ‘डंका’ या कथासंग्रहातील ‘थुंकी’, तृतीय पंथीयांच्या आयुष्याची लढाईवर प्रकाश टाकणारी अस्तित्वाची लढाई ही कथा जयश्री बागुल यांनी सादर केली. तर ‘बेवारस’ ही कथा कथाकार रोहित पगारे यांनी सांगितली.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक