शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

ज्ञानासाठी कला हा सिद्धांत प्रस्थापित होण्याची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:03 IST

कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे,

नाशिक : कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.  निमित्त होते, मंगळवारी (दि.२५) परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित तिसऱ्या बोधिकला संगितीच्या उद्घाटनाचे. राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ व बोधी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोधिकला संगितीच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून देशमुख बोलत होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य-संस्कृती मंडळाचे सदस्य शशिकांत सावंत, अशोक हांडोरे, राज बाळदकर, भगवान हिरे उपस्थित होते.  हांडोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरेश मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान,‘मराठी साहित्यातील वैचारिकता’ या विषयावर परिसंवाद रंगला.  अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अनिल सपकाळ होते, तर देवेंद्र उबाळे, मुकुंद कुलकर्णी, डॉ. अलका शिंदे-पवार, हरीश इथापे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, चंद्रकांत महामिने, डॉ. बी. जी. वाघ, कवी किशोर पाठक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.रंगले काव्यकार संमेलन व कथाकथन सत्रमनाला भिडणाºया कथा व समाज आणि व्यवस्थेबाबतच्या सत्य परिस्थितीचे चित्रण करणाºया कवितांनी वास्तववादाचे चित्रण करत बोधी कला संगितीच्या दुसºया सत्रात बुधवारी (दि. २६) औरंगाबादकर सभागृहात कपूर वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली काव्यकार संमेलन रंगले. थेट मानवी वृत्तीचे दर्शन घडणाºया साहित्यकृतींनी प्रेक्षकांना अंर्तमुख केले. सोबतच समानतेसाठी विद्रोही भूमिकाही ताकदीने मांडण्यात काव्यकार यशस्वी ठरले. कथाकथनाचा कार्यक्र म ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरु वातीला लेखक नंदिकशोर साळवे यांनी ‘डंका’ या कथासंग्रहातील ‘थुंकी’, तृतीय पंथीयांच्या आयुष्याची लढाईवर प्रकाश टाकणारी अस्तित्वाची लढाई ही कथा जयश्री बागुल यांनी सादर केली. तर ‘बेवारस’ ही कथा कथाकार रोहित पगारे यांनी सांगितली.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक