शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

गळ्यात कांद्याच्या माळा, मूठभर कापसाच्या ज्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:44 IST

कळवण : कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. २२) मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर गळ्यात कांद्याच्या माळा घालतानाच मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला.

कळवण : कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. २२) मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर गळ्यात कांद्याच्या माळा घालतानाच मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरू झाली असली तरी अत्यंत धिम्या गतीने होत आहे. तसेच एफएक्यूच्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखूड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरू करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरू करावी या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी एकाच वेळी महाराष्ट्रभर मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी यावेळी दिली. केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. अडचणीत असलेल्या कांदा शेतकºयांना सावरण्यासाठी काहीच केले नाही. नाफेडमार्फत २००० रु पये प्रतिक्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा, अशीही शेतकरी संघटनेची मागणी असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकºयांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून कापूस जाळण्याचे आंदोलन केले. यावेळी लॉकडाउनचे सर्व नियम पाळण्यात आले. कांदा व कापूस उत्पादक शेतकºयांच्या भावना व नाराजी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. आंदोलनात यावेळी मविप्र संचालक अशोक पवार, शेतकरी नेते शांताराम जाधव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, जगन पाटील, दादा देशमुख, एकनाथ गांगुर्डे, हिरामण वाघ, सुभाष पगार, रमेश बच्छाव, जगन्नाथ पाटील, ज्ञानेश्वर वाघ आदी सहभागी झाले होते.-----तासाभरात दोन आंदोलनसकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान कांदा, मका, द्राक्ष, कापूस प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी मध्यवर्ती इमारतीच्या पायरीवर कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन केले. यावेळी तहसीलदार बी.ए. कापसे यांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, छावाचे तालुकाप्रमुख प्रदीप पगार उपस्थित होते. त्यानंतर काही वेळात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील आवारात शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येत मूठभर कापूस जाळून कांदा व कापूसप्रश्नी आंदोलन केले.

टॅग्स :Nashikनाशिक