शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

प्रगतीसाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:31 IST

नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण ...

ठळक मुद्देकसबे : अंधारातून उजेडाकडे पुस्तक प्रकाशन

नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण वाढले तरी जातीभेद कमी झालेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली.रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव लिखित ‘अंधारातून उजेडाकडे’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात कसबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे होते. यावेळी कसबे म्हणाले की, जाती-जातीमधील वाढती दरी ही देशाच्या विकासासाठी मारक ठरणारी आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्व जातीतील समाज बांधवांनी सर्वच समस्यांचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे व मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी रामचंद्र जाधव यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर दराडे, आमदार बाळासाहेब सानप, शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहसंचालक दिनकर टेमकर, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, नाएसोचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंधारातून उजेडाकडे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रत्नाकर अहिरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास एसएससी बोर्डाचे अध्यक्ष किशोर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, एम. व्ही. कदम, प्रवीण अहिरे, पुष्पा पाटील, सचिन पिंगळे, प्रकाश आंधळे, एस. बी. देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य