शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

प्रगतीसाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:31 IST

नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण ...

ठळक मुद्देकसबे : अंधारातून उजेडाकडे पुस्तक प्रकाशन

नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण वाढले तरी जातीभेद कमी झालेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली.रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव लिखित ‘अंधारातून उजेडाकडे’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात कसबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे होते. यावेळी कसबे म्हणाले की, जाती-जातीमधील वाढती दरी ही देशाच्या विकासासाठी मारक ठरणारी आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्व जातीतील समाज बांधवांनी सर्वच समस्यांचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे व मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी रामचंद्र जाधव यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर दराडे, आमदार बाळासाहेब सानप, शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहसंचालक दिनकर टेमकर, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, नाएसोचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंधारातून उजेडाकडे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रत्नाकर अहिरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास एसएससी बोर्डाचे अध्यक्ष किशोर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, एम. व्ही. कदम, प्रवीण अहिरे, पुष्पा पाटील, सचिन पिंगळे, प्रकाश आंधळे, एस. बी. देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य