शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीसाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:31 IST

नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण ...

ठळक मुद्देकसबे : अंधारातून उजेडाकडे पुस्तक प्रकाशन

नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण वाढले तरी जातीभेद कमी झालेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली.रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव लिखित ‘अंधारातून उजेडाकडे’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात कसबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे होते. यावेळी कसबे म्हणाले की, जाती-जातीमधील वाढती दरी ही देशाच्या विकासासाठी मारक ठरणारी आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्व जातीतील समाज बांधवांनी सर्वच समस्यांचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे व मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी रामचंद्र जाधव यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर दराडे, आमदार बाळासाहेब सानप, शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहसंचालक दिनकर टेमकर, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, नाएसोचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंधारातून उजेडाकडे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रत्नाकर अहिरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास एसएससी बोर्डाचे अध्यक्ष किशोर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, एम. व्ही. कदम, प्रवीण अहिरे, पुष्पा पाटील, सचिन पिंगळे, प्रकाश आंधळे, एस. बी. देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य