शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

जिल्ह्यात सुरळीत पार पडली ‘नीट’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:04 IST

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.

नाशिक : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.बारावीनंतर पुढील करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा महत्त्वाची मानली जाते. यंदा बारावीचा निकाल लागून बराच कालावधी उलटून गेल्यावरही कोरोनामुळे ही परीक्षा होण्याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये शंका होती. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा वेगवेगळ्या सत्रा मध्ये घेण्याचे ठरले.त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २0 हजार विद्यार्थ्यांसाठी ४४ केंद्र ठेवण्यात आले होते. दुपारी २ वाजता प्रत्यक्ष पेपर असला तरी, परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपासून टाइम स्लॉट देण्यात आला होता. प्रत्येकी ५0 याप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले, त्यामुळे साडेदहा वाजेपासून विद्यार्थी व पालकांची केंद्रावर गर्दी झाली. केंद्राच्या बाहेर मुले व मुली त्यांची स्वतंत्र रांग लावून, त्यात ६ फुटाचे अंतर ठेवण्यात आले होते. गेटवरच विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासून आत पाठविले जात होते, विद्यार्थ्यांना पेन, पॅड, मोबाइल अन्य वस्तू नेण्यास मनाई असल्याने गेटवरच वस्तू काढून घेण्यात आले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शासनाने पेन व मास्क पुरविले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे हँडसॅनिटाझर करण्यात आले. प्रत्येक वर्गात फक्त १२ विद्यार्थ्यांची सोय करण्यात येऊन दोन पर्यवेक्षक नेमण्यात आले होते.जिल्ह्यातील सर्व पेपर रात्री उशिरापर्यंत गोळा करण्याचे काम सुरू होते. पेपर गोळा केल्यानंतर ते लगेच मुंबई व तेथून विमानाने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पालक केंद्राबाहेरचदुपारी २ वाजता केंद्राचे गेट बंद करण्यात आले. बाहेर गावातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केंद्राबाहेर वेळ घालविला. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पैकी ८८ टक्के विद्यार्थी परीक्षेला हजर होते. ५ वाजता पेपर सुटल्यावर सर्वच केंद्रावर पुन्हा गर्दी झाली.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणexamपरीक्षा