शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

जिल्ह्यात सुरळीत पार पडली ‘नीट’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:04 IST

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.

नाशिक : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.बारावीनंतर पुढील करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा महत्त्वाची मानली जाते. यंदा बारावीचा निकाल लागून बराच कालावधी उलटून गेल्यावरही कोरोनामुळे ही परीक्षा होण्याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये शंका होती. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा वेगवेगळ्या सत्रा मध्ये घेण्याचे ठरले.त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २0 हजार विद्यार्थ्यांसाठी ४४ केंद्र ठेवण्यात आले होते. दुपारी २ वाजता प्रत्यक्ष पेपर असला तरी, परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपासून टाइम स्लॉट देण्यात आला होता. प्रत्येकी ५0 याप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले, त्यामुळे साडेदहा वाजेपासून विद्यार्थी व पालकांची केंद्रावर गर्दी झाली. केंद्राच्या बाहेर मुले व मुली त्यांची स्वतंत्र रांग लावून, त्यात ६ फुटाचे अंतर ठेवण्यात आले होते. गेटवरच विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासून आत पाठविले जात होते, विद्यार्थ्यांना पेन, पॅड, मोबाइल अन्य वस्तू नेण्यास मनाई असल्याने गेटवरच वस्तू काढून घेण्यात आले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शासनाने पेन व मास्क पुरविले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे हँडसॅनिटाझर करण्यात आले. प्रत्येक वर्गात फक्त १२ विद्यार्थ्यांची सोय करण्यात येऊन दोन पर्यवेक्षक नेमण्यात आले होते.जिल्ह्यातील सर्व पेपर रात्री उशिरापर्यंत गोळा करण्याचे काम सुरू होते. पेपर गोळा केल्यानंतर ते लगेच मुंबई व तेथून विमानाने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पालक केंद्राबाहेरचदुपारी २ वाजता केंद्राचे गेट बंद करण्यात आले. बाहेर गावातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केंद्राबाहेर वेळ घालविला. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पैकी ८८ टक्के विद्यार्थी परीक्षेला हजर होते. ५ वाजता पेपर सुटल्यावर सर्वच केंद्रावर पुन्हा गर्दी झाली.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणexamपरीक्षा