शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाला राष्ट्रवादीचा घेराव

By श्याम बागुल | Updated: August 27, 2018 18:29 IST

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला.

ठळक मुद्देआठ दिवसांत भरणार खड्डे : टोल बंद करण्याचे तोंडी आश्वासनआठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला. यावेळी प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद केला जाईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे (जि. ठाणे) ते धुळे हा मार्ग बीओटीद्वारे चौपदरी करण्यात आलेला असूनही त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून या रस्त्याची चाळण झालेली आहे. कल्याण फाटा ते वडपे (जि. ठाणे) या लांबीतील रस्त्याचीदेखील अशीच दुर्दशा झालेली असून, त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत टोल कंपन्यांकडून हा रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोपर्यंत या रस्त्यावरील टोल तत्काळ बंद करावा. येत्या आठ दिवसांत या रस्त्याची सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने टोल बंद पाडला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, मुख्तार शेख, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, धनंजय निकाळे, हिरामण खोसकर, सुषमा पगारे, समीना मेमन, किशोरी खैरनार, संजय खैरनार, बाळासाहेब गिते, सुरेखा निमसे, जीवन रायते, दत्ता पाटील, सुनील अहिरे, दादा कापडणीस, पूनम शहा, ज्ञानेश्वर पवार, रंजना गांगुर्डे, चिन्मय गाढे, मुकेश शेवाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक