शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राष्ट्रवादीतर्फे दिंडोरीत हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:16 IST

दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून जनता आता त्यांच्या खोटरडेपणाला कंटाळली असून सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले असून जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.

दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून जनता आता त्यांच्या खोटरडेपणाला कंटाळली असून सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले असून जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप ङ्क्तशिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देवून युती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळी तटकरे बोलत होते.दुपारी साडेबाराच्या दरम्यान दिंडोरी नाशिक कळवण रस्त्यावरील रंणतल येथील वृंदावन गार्डन येथून भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला . मोर्चाचे नेतृत्व तटकरे यांनी केले. मोर्चात कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार,,आमदार नरहरी झिरवाळ ,आमदार जयंत जाधव, दीपिका चव्हाण, जयंत जाधव, माजी आमदार दिलीप बनकर, संजय चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, कृऊबा सभापती दत्तात्रेय पाटील,महिला आघाडी अद्याक्ष प्रेरणा बलकवडे,भारती पवार,रंजन ठाकरे,प्रकाश वडजे,गजानन शेलार,बाळासाहेब जाधव,भास्कर भगरे,राजेंद्र उफाडे,अविनाश जाधव,सचिन देशमुख,डॉ योगेश गोसावी,शाम हिरे,गंगाधर निखाडे ,कैलास मवाळ आदींसह हजारो कार्यकर्ते सुमारे चार किलोमीटर पायी मोर्चात सहभागी झाले. मोर्चात काही शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते.ढोल ताशांच्या गजरात सरकार विरोधात घोषणा देत एक तासाने हल्लाबोल मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर धडकला . तेथे सभा होत सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला.