शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

राष्ट्रवादीतर्फे दिंडोरीत हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 17:16 IST

दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून जनता आता त्यांच्या खोटरडेपणाला कंटाळली असून सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले असून जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.

दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजप युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून जनता आता त्यांच्या खोटरडेपणाला कंटाळली असून सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले असून जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप ङ्क्तशिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देवून युती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळी तटकरे बोलत होते.दुपारी साडेबाराच्या दरम्यान दिंडोरी नाशिक कळवण रस्त्यावरील रंणतल येथील वृंदावन गार्डन येथून भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला . मोर्चाचे नेतृत्व तटकरे यांनी केले. मोर्चात कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार,,आमदार नरहरी झिरवाळ ,आमदार जयंत जाधव, दीपिका चव्हाण, जयंत जाधव, माजी आमदार दिलीप बनकर, संजय चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, कृऊबा सभापती दत्तात्रेय पाटील,महिला आघाडी अद्याक्ष प्रेरणा बलकवडे,भारती पवार,रंजन ठाकरे,प्रकाश वडजे,गजानन शेलार,बाळासाहेब जाधव,भास्कर भगरे,राजेंद्र उफाडे,अविनाश जाधव,सचिन देशमुख,डॉ योगेश गोसावी,शाम हिरे,गंगाधर निखाडे ,कैलास मवाळ आदींसह हजारो कार्यकर्ते सुमारे चार किलोमीटर पायी मोर्चात सहभागी झाले. मोर्चात काही शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते.ढोल ताशांच्या गजरात सरकार विरोधात घोषणा देत एक तासाने हल्लाबोल मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर धडकला . तेथे सभा होत सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला.