शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव परिसराला तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:28 IST

आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देमालेगाव : डी. के. कॉर्नर भागात पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोयगाव : आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या भागाकडे उतार असल्याने कृषी नगर, चर्चगेट भागातील पाणी या भागात वाहत येते. तसेच पाण्यामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच दाभाडी, रोकडोबानगर या ग्रामीण भागातील लोकांचाही या रस्त्याने वावर असतो. तसेच शाळकरी मुले, नोकरदार यांनाही याचा सामना करावा लागतो. खड्ड्यांच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यालगत नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात असल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.नवीन वाहनचालकांना माहित नसल्याने पडझड तर नेहमीची झाली आहे. रिकाम्या प्लॉटवर पाणी साचून दुर्गंधी, किटक डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मोकाट प्राणी येऊन घाण करतात. घराबाहेर पाऊल ठेवताच पाण्याचा संघर्ष करावा लागतोच. अनेक वेळा मोठ्या गाड्या बंद पडतात तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजुने पथदीप नसल्याने अंधार राहतो यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. तरीही पालिका महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. तरी लवकरात लवकर पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.उपमहापौरांकडून समस्या सुटण्याची अपेक्षासोयगाव येथील डे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून, तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशी परिस्थिती फक्त याच भागातील नसून सोयगावसह संपूर्ण शहरात आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे बºयाच ठिकाणी खड्ड्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांसह पायी चालणाºया नागरिकांना कसरत करावी लागते. रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गटार काम नळजोडणी अशा अनेक कामांसाठीदेखील रस्ते खोदले जातात. तसेच साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करुनही महानगरपालिकेसह स्थानिक नगरसेवकदेखील या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कचरा, दुर्गंधी अशा समस्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. समस्यांचा ग्रामीण भागातील लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. सोयगावातील नववसाहत, शिव कॉलनी, चर्चगेट रोड, मित्रनगर, एकतानगर अशा भागात मोठ्या समस्या आहेत. उपमहापौर ही सोयगाव येथील असल्याने लवकरच विकासकामे होतील अशी आशा नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकWaterपाणी