शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

सोयगाव परिसराला तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:28 IST

आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देमालेगाव : डी. के. कॉर्नर भागात पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोयगाव : आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या भागाकडे उतार असल्याने कृषी नगर, चर्चगेट भागातील पाणी या भागात वाहत येते. तसेच पाण्यामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच दाभाडी, रोकडोबानगर या ग्रामीण भागातील लोकांचाही या रस्त्याने वावर असतो. तसेच शाळकरी मुले, नोकरदार यांनाही याचा सामना करावा लागतो. खड्ड्यांच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यालगत नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात असल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.नवीन वाहनचालकांना माहित नसल्याने पडझड तर नेहमीची झाली आहे. रिकाम्या प्लॉटवर पाणी साचून दुर्गंधी, किटक डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मोकाट प्राणी येऊन घाण करतात. घराबाहेर पाऊल ठेवताच पाण्याचा संघर्ष करावा लागतोच. अनेक वेळा मोठ्या गाड्या बंद पडतात तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजुने पथदीप नसल्याने अंधार राहतो यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. तरीही पालिका महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. तरी लवकरात लवकर पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.उपमहापौरांकडून समस्या सुटण्याची अपेक्षासोयगाव येथील डे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून, तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशी परिस्थिती फक्त याच भागातील नसून सोयगावसह संपूर्ण शहरात आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे बºयाच ठिकाणी खड्ड्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांसह पायी चालणाºया नागरिकांना कसरत करावी लागते. रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गटार काम नळजोडणी अशा अनेक कामांसाठीदेखील रस्ते खोदले जातात. तसेच साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करुनही महानगरपालिकेसह स्थानिक नगरसेवकदेखील या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कचरा, दुर्गंधी अशा समस्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. समस्यांचा ग्रामीण भागातील लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. सोयगावातील नववसाहत, शिव कॉलनी, चर्चगेट रोड, मित्रनगर, एकतानगर अशा भागात मोठ्या समस्या आहेत. उपमहापौर ही सोयगाव येथील असल्याने लवकरच विकासकामे होतील अशी आशा नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकWaterपाणी